केस गळती, कोंडा, अकाली पांढरे होणे आणि केस विरळ होण्याच्या समस्यांमुळे अनेक जण त्रस्त आहेत. बाजारात उपलब्ध केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर वाढत असला, तरी त्याचे दुष्परिणामही तितकेच वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आजीबाईंच्या काळातील घरगुती आणि नैसर्गिक उपायांकडे पुन्हा एकदा लोकांचा कल वाढताना दिसतो आहे.
पूर्वी महिलांचे केस दाट, लांब आणि मजबूत असायचे. त्यामागे कोणतेही महागडे प्रॉडक्ट नव्हते, तर नैसर्गिक तेलं, बिया आणि औषधी वनस्पतींचा नियमित वापर होता. आजही हे उपाय तितकेच परिणामकारक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
आवळा तेल केसांच्या मुळांना मजबुती देतो आणि केस गळती कमी करण्यास मदत करतो.
मेथी पावडर केसांना पोषण देत दाट आणि मजबूत बनवते.
भिजवलेले तीळ केसांना आवश्यक पोषक घटक पुरवून नैसर्गिक काळसरपणा टिकवतात.
तर नारळ तेल व लिंबू यांचा वापर स्कॅल्प स्वच्छ ठेवून कोंड्याची समस्या कमी करतो.
नियमितपणे या घरगुती उपायांचा अवलंब केल्यास केसांचे आरोग्य सुधारते, तसेच केमिकल्समुळे होणारे नुकसान टाळता येते. सौंदर्य टिकवण्यासाठी महागड्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास, परवडणारे गृहनिर्माण, स्वच्छता आणि आधुनिक पायाभूत सुविधा…
कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…
६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…
निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…