आरोग्य

केमिकल्सला नकार, आजीबाईंच्या घरगुती उपायांकडे पुन्हा ओढा;

केस गळती, कोंडा, अकाली पांढरे होणे आणि केस विरळ होण्याच्या समस्यांमुळे अनेक जण त्रस्त आहेत. बाजारात उपलब्ध केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर वाढत असला, तरी त्याचे दुष्परिणामही तितकेच वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आजीबाईंच्या काळातील घरगुती आणि नैसर्गिक उपायांकडे पुन्हा एकदा लोकांचा कल वाढताना दिसतो आहे.

पूर्वी महिलांचे केस दाट, लांब आणि मजबूत असायचे. त्यामागे कोणतेही महागडे प्रॉडक्ट नव्हते, तर नैसर्गिक तेलं, बिया आणि औषधी वनस्पतींचा नियमित वापर होता. आजही हे उपाय तितकेच परिणामकारक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

आवळा तेल केसांच्या मुळांना मजबुती देतो आणि केस गळती कमी करण्यास मदत करतो.

मेथी पावडर केसांना पोषण देत दाट आणि मजबूत बनवते.

भिजवलेले तीळ केसांना आवश्यक पोषक घटक पुरवून नैसर्गिक काळसरपणा टिकवतात.

तर नारळ तेल व लिंबू यांचा वापर स्कॅल्प स्वच्छ ठेवून कोंड्याची समस्या कमी करतो.

नियमितपणे या घरगुती उपायांचा अवलंब केल्यास केसांचे आरोग्य सुधारते, तसेच केमिकल्समुळे होणारे नुकसान टाळता येते. सौंदर्य टिकवण्यासाठी महागड्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

52 मिनिटे ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

56 मिनिटे ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

60 मिनिटे ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

1 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

5 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

5 तास ago