आरोग्य

हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत; योग्य आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्तीत वाढ

हिवाळ्याच्या दिवसांत मानवी शरीराची पचनशक्ती इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक सक्षम असते. त्यामुळे या काळात घेतलेला आहार शरीराला चांगल्या प्रकारे लागतो. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी हिवाळी आहाराला विशेष महत्त्व आहे, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

हिवाळ्यात शरीराला ऊब देणारे पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. तीळ आणि गूळ हे उष्ण गुणधर्माचे असून गुळात लोहाचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच मकर संक्रांतीच्या काळात तीळगुळाचे पदार्थ खाल्ले जातात. तसेच बाजरीची भाकरी शरीराला ऊब देत असून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

या ऋतूत उपलब्ध असलेल्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी, शेपू, मोहरीचा साग यामध्ये लोह व जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. गाजर, बीट, रताळी यांसारखी कंदमुळे आहारात घेतल्यास शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे मिळतात. गाजराचा हलवा किंवा कांजी हे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.

हिवाळ्यात विशेषतः डिंकाचे लाडू, साजूक तूप आणि सुका मेवा यांचा समावेश केल्यास हाडे मजबूत राहतात. रात्री भिजवलेले बदाम किंवा खारीक दुधात घेणे शक्तिवर्धक ठरते. तसेच संत्री, मोसंबी, आवळा, पेरू यांसारखी व्हिटॅमिन-सी युक्त फळे सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करतात.

सीताफळ आणि बोरं ही हिवाळ्यातील खास फळे असून त्यांचा वापर करणे फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. जेवणात आलं, लसूण आणि मिरी यांचा वापर केल्यास कफ कमी होण्यास मदत होते.

तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात तहान कमी लागत असली तरी कोमट पाणी नियमित प्यावे, ताजे व गरम अन्न घ्यावे आणि अति तेलकट तसेच जंक फूड टाळावे. योग्य आहार आणि दिनचर्या पाळल्यास हिवाळा आरोग्यदायी ठरू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

8 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

14 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

14 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

14 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

15 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago