आरोग्य

आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम? पाहा गार-गरम पाण्याचे फायदे-तोटे

आपल्या आजुबाजुला आपण असे अनेक लोक पाहताे जे कायम थंड पाण्याने आंघोळ करतात. मग तो अगदी पावसाळा किंवा हिवाळा असेल तरीही ते आंघोळीसाठी थंडच पाणी घेतात. एवढ्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ हे ऐकूनच अनेकांना हुडहुडी भरते. पण जे हा नियम पाळतात ते मात्र अगदी फिट असतात कारण त्यांच्या प्रकृतीला ते अनुकूल असतं. त्याउलट काही जण गरम पाण्याने आंघोळ करूनही हिवाळ्यातले अर्धे दिवस सर्दी- पडशाने हैराण असतात. त्यामुळेच आंघोळीसाठी कोणतं पाणी घ्यावं हे जर आपण आपल्या प्रकृतीनुसार ठरवलं तर त्याचा बराचसा फायदा होऊ शकतो

गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

१) गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे आखडून गेलेले स्नायू मोकळे होऊन रिलॅक्स वाटते.

२) झोप अधिक चांगली येण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे अधिक फायदेशीर असल्याचे मानले जाते.

३) गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे शारिरीक, मानसिक त्रास कमी होतो.

४) श्वसन संस्थेसाठीही गरम पाण्याने आंघोळ करणे अधिक फायदेशीर मानले जाते.

५) ज्यांना सांधेदुखी, डोकेदुखीचा त्रास असतो, त्यांनी गरम पाण्याने आंघोळ करावी.

६) गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण अधिक चांगले होते.

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

१) थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हटलं जातं.

२) थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे एनर्जी जास्त वाढते.

३) जे लोक थंड पाण्याने आंघोळ करतात त्यांनी त्वचा आणि केस जास्त चांगले असतात.

४) शरीरातील टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढतो.

५) मनातले नकारात्मक विचार कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

5 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

5 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

5 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

5 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

7 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

7 तास ago