आरोग्य

तुमच्या आरोग्यासाठी सोप्पे उपाय

१) चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी:- तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्री झोपतांना चेहर्यातवर लावावा आणि सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.

२) उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी:- उष्णतेमुळे ओठाची व तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉइस्चरायझिंग क्रीम लावून हळुवार मसाज करावा. सकाळ व संध्याकाळ एक चमचा प्रवाळ मिश्रित गुलकंद खावा.

३) चेहऱ्याखालची कांती उजळण्यासाठी:- एक चमचचा टोमॅटोचा गर ,चिमूटभर हळद,अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बेसन एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्या ला लावा. अर्ध्या तासाने कापसाने चेहरा पुसून काढा. त्वचा उजळेल.

४) केसातील कोंडा घालविण्यासाठी:- केसातील कोंडा फारच सतावतो. त्यावर उपचारासाठी आवळा, हिरडा, बेहडा, शिकेकाई, संत्र्याचे साल यांचा उपयोग करावा. यापासून घरच्या घरी औषध करता येईल.

५) मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी:- आठवड्यातून किमान एकदा उतण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ करून घ्यायला हवी. मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये.

६) केसांचा तेलकटपणा कमी करण्यासाठी:- केस धुतल्यावरही तेलकटपणा कमी न झाल्यास तीन लहान चमचे लिंबाचा रस घेऊन केस धुवून झाल्यावर लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास नक्कीच फायदा होईल.

७) ओठ फाटल्यास उपाय:- ओठ फातून त्यातून रक्त येत असल्यास कोकमचे तेल आणि शुद्ध गाईचे तूप यांचा वापर करावा.

८) उन्हाळ्यात वापरायचे कपडे:- उन्हाळ्यात घाम जास्त येतो. म्हणून या काळांत पांढर्याच रंगाचे तलम सूती कपडे वापरावेत. सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळावा.

९) उन्हाळ्यात जर घाम जास्त येत असेल तर पाण्यात तुरटी घालून त्या पाण्याने आंघोळ करावी.

१०) कडक उन्हामुळे तुमच्या त्वचेचा रंग सावळा झाला असेल तर कच्च्या टोमॅटोला कुस्करून त्यात ताक मिसळून चेहर्याकला लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. दररोज आंघोळीच्या आधी शरीराच्या उघड्या भागाला दही लावून १० मिनिटापर्यन्त तसेच राहू द्या.मग आंघोळ करा.

११) टोमॅटोची पेस्ट करून तिचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजातवाणा दिसतो. मुरूम,पुटकुलया,सुरकुत्या,काळे डाग दूर होण्यास मदत होते.

१२) रक्तदाब कमी करण्यासाठी:- ६-७ लसणाच्या पाकळ्या अर्धालीतर पाण्याच्या टाकून टी बाटली हलवावी व नंतर दोन तास तशीच ठेवावी. त्यानंतर तहान लागेल तेंव्हा त्या बाटलीतले पाणी प्यावे. असे पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नका; सतर्कताच आर्थिक फसवणुकीचा प्रभावी उपाय; कुमार कदम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असतानाच सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक,…

2 तास ago

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…

4 तास ago

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…

4 तास ago

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

4 तास ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

4 तास ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

5 तास ago