आरोग्य

तुमच्या आरोग्यासाठी सोप्पे उपाय

१) चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी:- तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्री झोपतांना चेहर्यातवर लावावा आणि सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.

२) उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी:- उष्णतेमुळे ओठाची व तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉइस्चरायझिंग क्रीम लावून हळुवार मसाज करावा. सकाळ व संध्याकाळ एक चमचा प्रवाळ मिश्रित गुलकंद खावा.

३) चेहऱ्याखालची कांती उजळण्यासाठी:- एक चमचचा टोमॅटोचा गर ,चिमूटभर हळद,अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बेसन एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्या ला लावा. अर्ध्या तासाने कापसाने चेहरा पुसून काढा. त्वचा उजळेल.

४) केसातील कोंडा घालविण्यासाठी:- केसातील कोंडा फारच सतावतो. त्यावर उपचारासाठी आवळा, हिरडा, बेहडा, शिकेकाई, संत्र्याचे साल यांचा उपयोग करावा. यापासून घरच्या घरी औषध करता येईल.

५) मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी:- आठवड्यातून किमान एकदा उतण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ करून घ्यायला हवी. मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये.

६) केसांचा तेलकटपणा कमी करण्यासाठी:- केस धुतल्यावरही तेलकटपणा कमी न झाल्यास तीन लहान चमचे लिंबाचा रस घेऊन केस धुवून झाल्यावर लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास नक्कीच फायदा होईल.

७) ओठ फाटल्यास उपाय:- ओठ फातून त्यातून रक्त येत असल्यास कोकमचे तेल आणि शुद्ध गाईचे तूप यांचा वापर करावा.

८) उन्हाळ्यात वापरायचे कपडे:- उन्हाळ्यात घाम जास्त येतो. म्हणून या काळांत पांढर्याच रंगाचे तलम सूती कपडे वापरावेत. सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळावा.

९) उन्हाळ्यात जर घाम जास्त येत असेल तर पाण्यात तुरटी घालून त्या पाण्याने आंघोळ करावी.

१०) कडक उन्हामुळे तुमच्या त्वचेचा रंग सावळा झाला असेल तर कच्च्या टोमॅटोला कुस्करून त्यात ताक मिसळून चेहर्याकला लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. दररोज आंघोळीच्या आधी शरीराच्या उघड्या भागाला दही लावून १० मिनिटापर्यन्त तसेच राहू द्या.मग आंघोळ करा.

११) टोमॅटोची पेस्ट करून तिचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजातवाणा दिसतो. मुरूम,पुटकुलया,सुरकुत्या,काळे डाग दूर होण्यास मदत होते.

१२) रक्तदाब कमी करण्यासाठी:- ६-७ लसणाच्या पाकळ्या अर्धालीतर पाण्याच्या टाकून टी बाटली हलवावी व नंतर दोन तास तशीच ठेवावी. त्यानंतर तहान लागेल तेंव्हा त्या बाटलीतले पाणी प्यावे. असे पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

2 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

13 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

13 तास ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

14 तास ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

14 तास ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

14 तास ago