पाणी पिण्यास विसरू नका. पाण्याव्यतिरिक्त इतर पेये पिण्यावर नियंत्रण आणा. या पेयांमुळे शरीरात जाणार्या कॅलरीजची संख्या वाढते आणि परिणामी वजन वाढते. भाज्यांचा रस, सूप यांचा आहारात समावेश करा. कधीतरी गोड खाण्यास हरकत नाही. मात्र त्यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा. अशा पदार्था मध्ये अॅडेड सुगर मोठ्या प्रमाणात असते. नीट बसून खा. घाईघाईत खाल्ल्यास बऱ्याचदा जरुरी पेक्षा जास्त अन्न पोटात जाते.
खातेवेळी टीव्ही बघणे, वाचणे टाळा. त्यामुळे खाण्याकडे दुर्लक्ष होते. भोजनामध्ये हृदयासाठी चांगल्या असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. जेवणाची चव चांगली असणे महत्त्वाचे आहेच, मात्र त्यासाठी त्यातील फॅट्स वाढवणे मुळीच चांगले नाही. सायीच्या दुधाऐवजी साधे दूध प्या. चव वाढवण्यासाठी मिठाऐवजी मसाले वापरा. सॅच्युरेटेड फॅट्स खाण्यापेक्षा भाज्यांमधून मिळणारे फॅट्स खा. स्वयंपाकघरातील सगळे जंक फूड बाहेर काढा आणि तेथे कर्बोदके असणारी पेये आणि फायबर-रिच बिस्किटे, ताजा रस यांसारखे निरोगी रेडी-टु-ईट पदार्थ ठेवा. वेळी अवेळी खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. दररोज रात्री दिवसभरात काय खाल्ले यावर एक नजर टाका. त्यातील किती पदार्थ खाणे गरजेचे होते हे स्वत:लाच विचारा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…