पाणी पिण्यास विसरू नका. पाण्याव्यतिरिक्त इतर पेये पिण्यावर नियंत्रण आणा. या पेयांमुळे शरीरात जाणार्या कॅलरीजची संख्या वाढते आणि परिणामी वजन वाढते. भाज्यांचा रस, सूप यांचा आहारात समावेश करा. कधीतरी गोड खाण्यास हरकत नाही. मात्र त्यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा. अशा पदार्था मध्ये अॅडेड सुगर मोठ्या प्रमाणात असते. नीट बसून खा. घाईघाईत खाल्ल्यास बऱ्याचदा जरुरी पेक्षा जास्त अन्न पोटात जाते.
खातेवेळी टीव्ही बघणे, वाचणे टाळा. त्यामुळे खाण्याकडे दुर्लक्ष होते. भोजनामध्ये हृदयासाठी चांगल्या असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. जेवणाची चव चांगली असणे महत्त्वाचे आहेच, मात्र त्यासाठी त्यातील फॅट्स वाढवणे मुळीच चांगले नाही. सायीच्या दुधाऐवजी साधे दूध प्या. चव वाढवण्यासाठी मिठाऐवजी मसाले वापरा. सॅच्युरेटेड फॅट्स खाण्यापेक्षा भाज्यांमधून मिळणारे फॅट्स खा. स्वयंपाकघरातील सगळे जंक फूड बाहेर काढा आणि तेथे कर्बोदके असणारी पेये आणि फायबर-रिच बिस्किटे, ताजा रस यांसारखे निरोगी रेडी-टु-ईट पदार्थ ठेवा. वेळी अवेळी खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. दररोज रात्री दिवसभरात काय खाल्ले यावर एक नजर टाका. त्यातील किती पदार्थ खाणे गरजेचे होते हे स्वत:लाच विचारा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…