पाणी पिण्यास विसरू नका. पाण्याव्यतिरिक्त इतर पेये पिण्यावर नियंत्रण आणा. या पेयांमुळे शरीरात जाणार्या कॅलरीजची संख्या वाढते आणि परिणामी वजन वाढते. भाज्यांचा रस, सूप यांचा आहारात समावेश करा. कधीतरी गोड खाण्यास हरकत नाही. मात्र त्यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा. अशा पदार्था मध्ये अॅडेड सुगर मोठ्या प्रमाणात असते. नीट बसून खा. घाईघाईत खाल्ल्यास बऱ्याचदा जरुरी पेक्षा जास्त अन्न पोटात जाते.
खातेवेळी टीव्ही बघणे, वाचणे टाळा. त्यामुळे खाण्याकडे दुर्लक्ष होते. भोजनामध्ये हृदयासाठी चांगल्या असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. जेवणाची चव चांगली असणे महत्त्वाचे आहेच, मात्र त्यासाठी त्यातील फॅट्स वाढवणे मुळीच चांगले नाही. सायीच्या दुधाऐवजी साधे दूध प्या. चव वाढवण्यासाठी मिठाऐवजी मसाले वापरा. सॅच्युरेटेड फॅट्स खाण्यापेक्षा भाज्यांमधून मिळणारे फॅट्स खा. स्वयंपाकघरातील सगळे जंक फूड बाहेर काढा आणि तेथे कर्बोदके असणारी पेये आणि फायबर-रिच बिस्किटे, ताजा रस यांसारखे निरोगी रेडी-टु-ईट पदार्थ ठेवा. वेळी अवेळी खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. दररोज रात्री दिवसभरात काय खाल्ले यावर एक नजर टाका. त्यातील किती पदार्थ खाणे गरजेचे होते हे स्वत:लाच विचारा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…
पुणे: “Lata Mangeshkar म्हणजे आयुष्याची कोमल वेल, तर Asha Bhosle म्हणजे त्या वेलीला मिळालेली…
1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर…
केसांच्या अनेक समस्यांमध्ये केसगळती व केस अकाली पांढरे होणे या दोन समस्या फारच कॉमन आहेत.…
डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची…