आरोग्य

पेन किलर गोळ्यांचे शरीरावर होणारे परिणाम…

पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध. आजचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे . सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात, या व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधीना सामोरे जावे लागते. कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता येईल. पण या गोळ्या घेतल्याने कायम स्वरूपी इलाज होत नाही तो तात्पुरता असतो आणि बऱ्याच जणांना हे माहित नसते कि पुढे जाऊन त्यांना या वेदना नाशक गोळ्यांचे वाईट दुष्परिणाम होऊ शकतात.

जास्त करुन लोक वेदना नाशक गोळ्या का घेतात ? जेंव्हा आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना असहनीय होतात तेंव्हा त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आपण पेन किलर घेतो. कारण या गोळ्यांमुळे लगेचच आराम मिळतो आणि हळू हळू आपल्याला या गोळ्यांची सवय लागते, या गोळ्या जर आपण सतत घेत असू तर आपल्याला हे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकते.

पेन किलर गोळ्यांमुळे होणारे नुकसान…

पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्या मुळे आपण वयस्कर दिसू लागतो.

रिकाम्या पोटी कधीही अशा गोळ्या घेऊ नका कारण यामुळे किडनी ( मूत्रपिंड ) संबंधी समस्या होऊ शकतात.

रोज घेतल्याने यकृत सबंधी समस्या उद्भवतात.

अशा गोळ्या रोज घेतल्याने आपल्याला घाबरल्या सारखे होते, निद्रानाश होतो, तसेच अस्वस्थता वाढते.

पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब देखील कमी होतो. काही खास गोष्टी लक्षात ठेऊन आपण पेन किलर घेऊ शकता.

जेवल्यावर ३० मिनिटांनंतर ह्या गोळ्या घ्या.

पेन किलर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा.

जर वेदना सारख्या सारख्या आणि असहनीय होत असतील तर डॉक्टर चा सल्ला घ्या.

पेन किलर नेहमी पाण्या सोबतच घेतल्या पाहिजेत.

पेन किलर च्या गोळ्या नेहमी डॉक्टर च्या सल्याने घेतल्या पाहिजेत.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

3 तास ago

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…

3 तास ago

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह…

3 तास ago

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…

4 तास ago

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…

4 तास ago

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…

4 तास ago