आरोग्य

युरिक ॲसिड वाढलंय, सांधे दुखतात, उपाशीपोटी हे पाणी प्या, दुखणं व्हायला लागेल कमी

चुकीचे खाणेपिणे, तणावपूर्ण जीवनशैली, जंक फूडचे अतिप्रमाणात खाणं, अपुरी झोप आणि कामाचा ताण याचा आपल्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढली की, अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जेव्हा युरिक ॲसिडची पातळी वाढते तेव्हा संधिवात, सांधेदुखी, हाडांचे दुखणे आणि किडनीचे आजार अशा अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात ही लक्षणे दिसतात आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.

परंतु, काही घरगुती उपाय केल्याने या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. अनेकदा सांधेदुखी किंवा हाडांते दुखणे सुरु झाले की, आपल्याला नीट उठता बसता येतं नाही. हाडांमधून आवाज येण्या सारख्या समस्या सुरु होतात. युरिक ॲसिड हे आपल्या रक्तातील टाकाऊ पदार्थ आहे. जे शरीरा प्युरीनचे विघटन करून ॲसिड तयार करते. जर आपल्या शरीरातील युरिक ॲसिड वारंवार वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, तसेच हा घरगुती उपाय केल्याने फायदा होईल.

1) रिकाम्या पोटी प्या पाणी

रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी प्यायल्यानं आरोग्याला अनेक फायदे होतील. शरीरातील युरिक ॲसिडची वाढलेली पातळी नियंत्रणात राहिल. वेलचीमध्ये अँटि ऑक्सिडंट, दाहक विरोधी आणि विषारी पदार्थ काढण्याचे गुणधर्म आहेत. जे शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढण्यास मदत करतात. शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे आरोग्य बिघडते. वेलचीचे पाणी प्यायल्याने शरीरातून हानिकारक घटक बाहेर काढले जातात. ते शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करते. तसेच हे पाणी प्यायल्याने यकृत आणि मूत्रपिंडात जमा झालेले हानिकारक घटक बाहेर पडतात. जर नियमितपणे सकाळी वेलीचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून देण्यास मदत होईल.

2) वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे

जेव्हा शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढते तेव्हा संधिवात, सांध्यातील सूज, मूत्रमार्गाचे आजार किंवा किडनी स्टोन सारख्या समस्या उद्धवतात. या सर्व समस्यांवर वेलचीचे पाणी रामबाण उपाय आहे. यांमुळे हाडांचे आरोग्य सुधारते. हाडांशी संबंधित कोणतीही समस्या असले तर हे पाणी जरुर प्या. वेलचीच्या पाण्यात भौतिक मूत्रवर्धक घटक आढळतात. वेलचीचे पाणी जास्त प्रमाणात प्यावे. यामुळे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम लघवीद्वारे बाहेर काढले जाते, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या टाळता येते.

3) वेलचीचे पाणी कसे तयार करावे

वेलचीचे पाणी तयार करण्यासाठी २ वेलची रात्रभर १ ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यानंतर वेलचीच्या बिया सोलून त्याचे पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल. बिघडलेली पचनक्रिया देखील सुरळीत होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

7 तास ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

7 तास ago

शिरूर तालुक्यात हजारो शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ प्रशासकीय पातळीवर प्रलंबित

कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती, तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारून शेतकरी हैराण    पाबळ (सुनिल…

7 तास ago

शिरुर अरणगाव येथे शेतकरी कार्यशाळा संपन्न; पिक उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाची जनजागृती मोहीम

न्हावरे (अक्षय टेमगिरे): अरणगाव (ता. शिरुर) खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया…

8 तास ago

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस सामूहिकरित्या साजरा…

शिरूर: शिरूर तालुक्यातील वाघाळे गावातील मान्यवरांचा १ जून रोजी सामूहिकरित्या वाढदिवस लहू थोरात (संचालक खरेदी…

13 तास ago

शिरुरमध्ये पत्रकाराला गलिच्छ भाषेत शिविगाळ करून बातमीचा व्हिडिओ हटविण्याचा प्रयत्न; अँड.विकास कुटे यांच्यावर गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दबाव टाकून डिजिटल पुरावे हटविण्यास भाग…

15 तास ago