आरोग्य

युरिक ॲसिड वाढलंय, सांधे दुखतात, उपाशीपोटी हे पाणी प्या, दुखणं व्हायला लागेल कमी

चुकीचे खाणेपिणे, तणावपूर्ण जीवनशैली, जंक फूडचे अतिप्रमाणात खाणं, अपुरी झोप आणि कामाचा ताण याचा आपल्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढली की, अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जेव्हा युरिक ॲसिडची पातळी वाढते तेव्हा संधिवात, सांधेदुखी, हाडांचे दुखणे आणि किडनीचे आजार अशा अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात ही लक्षणे दिसतात आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.

परंतु, काही घरगुती उपाय केल्याने या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. अनेकदा सांधेदुखी किंवा हाडांते दुखणे सुरु झाले की, आपल्याला नीट उठता बसता येतं नाही. हाडांमधून आवाज येण्या सारख्या समस्या सुरु होतात. युरिक ॲसिड हे आपल्या रक्तातील टाकाऊ पदार्थ आहे. जे शरीरा प्युरीनचे विघटन करून ॲसिड तयार करते. जर आपल्या शरीरातील युरिक ॲसिड वारंवार वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, तसेच हा घरगुती उपाय केल्याने फायदा होईल.

1) रिकाम्या पोटी प्या पाणी

रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी प्यायल्यानं आरोग्याला अनेक फायदे होतील. शरीरातील युरिक ॲसिडची वाढलेली पातळी नियंत्रणात राहिल. वेलचीमध्ये अँटि ऑक्सिडंट, दाहक विरोधी आणि विषारी पदार्थ काढण्याचे गुणधर्म आहेत. जे शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढण्यास मदत करतात. शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे आरोग्य बिघडते. वेलचीचे पाणी प्यायल्याने शरीरातून हानिकारक घटक बाहेर काढले जातात. ते शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करते. तसेच हे पाणी प्यायल्याने यकृत आणि मूत्रपिंडात जमा झालेले हानिकारक घटक बाहेर पडतात. जर नियमितपणे सकाळी वेलीचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून देण्यास मदत होईल.

2) वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे

जेव्हा शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढते तेव्हा संधिवात, सांध्यातील सूज, मूत्रमार्गाचे आजार किंवा किडनी स्टोन सारख्या समस्या उद्धवतात. या सर्व समस्यांवर वेलचीचे पाणी रामबाण उपाय आहे. यांमुळे हाडांचे आरोग्य सुधारते. हाडांशी संबंधित कोणतीही समस्या असले तर हे पाणी जरुर प्या. वेलचीच्या पाण्यात भौतिक मूत्रवर्धक घटक आढळतात. वेलचीचे पाणी जास्त प्रमाणात प्यावे. यामुळे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम लघवीद्वारे बाहेर काढले जाते, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या टाळता येते.

3) वेलचीचे पाणी कसे तयार करावे

वेलचीचे पाणी तयार करण्यासाठी २ वेलची रात्रभर १ ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यानंतर वेलचीच्या बिया सोलून त्याचे पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल. बिघडलेली पचनक्रिया देखील सुरळीत होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago