मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन तिघांना मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात कडवळ तोडण्याच्या वादातून एका महिलेसह तिच्या पती व नातलगावर लोखंडी गज व लाकडी काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून सात आरोपींविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी साधना शंकर देशमुख (वय ३६) रा. न्हावरे, ता. शिरुर, जि. पुणे) या दि ०३ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास पती शंकर देशमुख व भावजय यशश्री हिंगे यांच्यासह शेत गट नं. २६४ मधून तोडलेले कडवळ मोटारसायकलवरुन नेत होत्या. त्याचवेळी गावच्या हद्दीत न्हावरे ते चिंचणी रोडवर आरोपींनी संगनमत करुन मोटारसायकल अडवून “हे आमच्या बापाच्या रानातील कडवळ आहेत, तुम्ही कसे काय तोडताय” असे म्हणत अचानक हल्ला केला.

या हल्ल्यात लोखंडी गज, लाकडी काठ्या व लाथाबुक्क्यांनी फिर्यादीसह त्यांच्या वडिलांना त्रिंबक दादाभाऊ हिंगे आणि पती शंकर देशमुख यांना गंभीर दुखापत केली. फिर्यादीच्या पतीचे दोन दात पडले असून दोघांच्या हाताला चावाही घेतल्याची माहिती आहे.

तसेच आरोपींनी “पुन्हा आमच्या रानात आलात तर जीवंत सोडणार नाही” अशी धमकी देत साधना शंकर देशमुख, त्रिंबक दादाभाऊ हिंगे, शंकर देशमुख यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. तसेच याबाबत साधना देशमुख यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन मंदा हनुमंत देशमुख, कांचन महेश देशमुख, रुपाली हनुमंत देशमुख, प्रियंका जगदाळे, महेश हनुमंत देशमुख, तुकाराम जयवंत देशमुख, हनुमंत जयवंत देशमुख (सर्व रा. न्हावरे, निंबाळकरवस्ती, ता. शिरुर, जि. पुणे) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार शिवाजी बनकर हे करत आहेत.

शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

शिरुर तालुक्यात रस्त्याच्या कामादरम्यान टँकरच्या धडकेत मजुराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago