आरोग्य

शरीरात व्हिटॅमिन ई कमी झाल्यास होतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध

शरीर निरोगी ठेवण्यात वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स खूप महत्वाचे ठरत असतात. वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सपैकी एक म्हणज व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई आपलं शरीर निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन ई एक पॉवरफूल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि जे आपल्या शरीराचा फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून बचाव करतं. मात्र, हे व्हिटॅमिन शरीरात जर कमी झालं तर शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

व्हिटॅमिन ई कमी झाल्याचे लक्षण

शरीरात व्हिटॅमिन ई कमी झालं किंवा पुरेसं व्हिटॅमिन ई मिळालं नाही तर मांसपेशी कमजोर होतात, दृष्टीसंबंधी समस्या होता आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते. इतकंच नाही तर त्वचा कोरडी पडते, केसगळती होते आणि एनीमियाही होऊ शकतो.

तसेच स्थिती गंभीर असेल तर व्यक्तीला चालण्यात अडचण होते, मांसपेशींमध्ये कंपण होतं. व्हिटॅमिन ई कमी झाल्याने महिलांना प्रजननातही समस्या होऊ शकते. जर यावर वेळीच उपाय केला नाही किंवा उपचार घेतले नाही तर हृदयरोग आणि कॅन्सरसारख्य गंभीर समस्याही होऊ शकतात.

रोज किती व्हिटॅमिन ई ची गरज

14 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या पुरूष आणि महिलांना रोज साधारण १५ मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई ची गरज असते. स्तनपान करणाऱ्या महिलांना रोज १९ मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई ची गरज असते.

कशातून मिळवाल व्हिटॅमिन ई

हिरव्या पालेभाज्या

व्हिटॅमिन ई ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही नियमितपणे हिरव्या पालेभाज्यांचं सेवन केलं पाहिजे. बदाम आणि अक्रोडही व्हिटॅमिन ई चांगलं सोर्स आहेत. इतकंच नाही तर याने शरीराला इतरही अनेक फायदे मि्ळतात.

फळं

व्हिटॅमिन ई मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये एवोकाडो, कीवी, आंबे अशा फळांचा समावेश करावा. या फळांचं नियमितपणे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन ई मिळतं.

आणखी कशातून मिळेल हे व्हिटॅमिन

सनफ्लॉवर तेल, सोयाबीन तेल

मोहरीच्या बीया

बदाम

शेंगदाणे

बीट, पालक

भोपळा

लाल शिमला मिरची

व्हिटॅमिन ई कमी होण्याचं कारण

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे व्हिटॅमिन ई असलेल्या पदार्थांचं सेवन न करणं. त्याशिवाय ही समस्या अनुवांशिकतेमुळेही होते. तुमच्या कुटुंबात कुणाला ही समस्या असेल तर तुम्हालाही होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लुडो खेळाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपीसह तिघांना अटक

अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण…

24 मिनिटे ago

रांजणगाव M.I.D.C मध्ये औद्योगिक शांततेसाठी पोलीस-उद्योग प्रतिनिधींची समन्वय बैठक संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव M.I.D.C परिसरातील औद्योगिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, कामगार सुरक्षा तसेच…

2 तास ago

मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग बंद; नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या…

6 तास ago

‘पाईप चोरी’ प्रकरणात फिर्यादी व स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करा; अनिल बांडे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात…

6 तास ago

पँटमध्ये लपलेल्या विंचवाचा 12 वर्षीय मुलाला दंश; डॉक्टरांच्या प्रयत्नांनी 72 तासांनंतर जीव वाचला

पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन  चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू,…

6 तास ago

हिरवा कफ झाल्यावर अ‍ॅंटी बायोटिक्स घ्यावे की नाही

वातावरण बदल झाला की, लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. सर्दी खोकला होणं तर कॉमनच आहे.…

6 तास ago