नाश्ता करणं का गरजेचं आहे
जेव्हा आपण रात्रीचं जेवण करून झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ तासांचे फास्टींग करतो तेव्हा शरीराला खाण्याची आवश्यकता असते जेणेकरून शरीरात एनर्जी राहील. तुम्ही नाश्त्याला काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार ते अवलंबून असते. ज्यामुळे तुम्हाला उर्जावान आणि हेल्दी राहता येईल.
नाश्ता करणं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतो?
आजकाल जीवनशैली अशी झाली आहे बऱ्याच गोष्टींकडे आपलं लक्ष नसते. कामाच्या ताण-तणावामुळे खाणंपिणं बिघडलं आहे. यामुळे लोक नाश्ता करणं सोडून देतात. त्यांना असं वाटतं की नाश्ता सोडल्यामुळे वेगानं वजन कमी करण्यास मदत होते. असे लोक नाश्त्याला फळं, सॅलेड आणि स्मूदी घेऊ शकतात. ज्यामुळे शरीरात पोषणाची कमतरता भासत नाही.
नाश्ता करणं सोडल्यामुळे मेटाबॉलिक रेट कमी होतो
खासकरून जेव्हा तुम्ही सकाळचा नाश्ता स्किप करता तेव्हा तुमचा मेटाबॉलिज्म स्लो होऊ शकतो, ज्यामुळे वजन वाढतं. वजन कमी करण्यात अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही खूप कमी कॅलरीज घेत असाल तर मेटाबॉलिक रेट स्लो होतो. नाश्ता करणं सोडल्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. इम्यूनिटी कमी होते. सेल्स डॅमेज होतात. शरीराला आजारांशी लढण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. जर तुम्ही एक वेळची पोषक तत्व कमी घेतली तर याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…