नाश्ता करणं का गरजेचं आहे
जेव्हा आपण रात्रीचं जेवण करून झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ तासांचे फास्टींग करतो तेव्हा शरीराला खाण्याची आवश्यकता असते जेणेकरून शरीरात एनर्जी राहील. तुम्ही नाश्त्याला काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार ते अवलंबून असते. ज्यामुळे तुम्हाला उर्जावान आणि हेल्दी राहता येईल.
नाश्ता करणं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतो?
आजकाल जीवनशैली अशी झाली आहे बऱ्याच गोष्टींकडे आपलं लक्ष नसते. कामाच्या ताण-तणावामुळे खाणंपिणं बिघडलं आहे. यामुळे लोक नाश्ता करणं सोडून देतात. त्यांना असं वाटतं की नाश्ता सोडल्यामुळे वेगानं वजन कमी करण्यास मदत होते. असे लोक नाश्त्याला फळं, सॅलेड आणि स्मूदी घेऊ शकतात. ज्यामुळे शरीरात पोषणाची कमतरता भासत नाही.
नाश्ता करणं सोडल्यामुळे मेटाबॉलिक रेट कमी होतो
खासकरून जेव्हा तुम्ही सकाळचा नाश्ता स्किप करता तेव्हा तुमचा मेटाबॉलिज्म स्लो होऊ शकतो, ज्यामुळे वजन वाढतं. वजन कमी करण्यात अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही खूप कमी कॅलरीज घेत असाल तर मेटाबॉलिक रेट स्लो होतो. नाश्ता करणं सोडल्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. इम्यूनिटी कमी होते. सेल्स डॅमेज होतात. शरीराला आजारांशी लढण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. जर तुम्ही एक वेळची पोषक तत्व कमी घेतली तर याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…