आरोग्य

जळवात म्हणजे काय

तळपायाला भेगा पडणे या त्रासाला जळवात असे म्हणतात. जळवात ही तळव्याची एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. जळवात आजाराला English मध्ये Cracked Heels ह्या नावाने ओळखले जाते. येथे जळवात का होतो व जळवातवरील उपायांची माहिती खाली दिली आहे.

जळवात होण्याची कारणे

जळवात होण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये

अनवाणी चालण्याच्या सवयीमुळे,

अधिक वेळ उभे राहण्याच्या सवयीमुळे,

आरामदायी चपला, सँडल किंवा बूट न वापरण्यामुळे,

हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंड वातावरणामुळे पायाची त्वचा कोरडी (dry skin) झाल्यामुळे,

जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्याच्या सवयीमुळे,

पुरेसे पाणी न पिण्याच्या सवयीमुळे,

व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे,

डायबेटीस, हायपो-थायरॉईडीजम, लठ्ठपणा, सोरायसिस, त्वचेचे विकार यासारखे त्रास असल्यासही जळवात होऊन तळपायाला भेगा पडण्याची समस्या होत असते.

जळवाताची लक्षणे 

जळवात मध्ये तळपायाला भेगा पडतात. त्याठिकाणची त्वचा फाटते, त्वचा रुक्ष व खडबडीत होते. काहीजणांना जळवातमुळे तळपायाला भेगा पडून त्याठिकाणी जखमा, वेदना व रक्तस्राव होणे असे त्रासही होत असतात.

जळवातवर हे करा घरगुती उपाय 

१) मध

जळवातमध्ये पायाच्या भेगा भरून काढण्यासाठी मधातील अँटी-मायक्रोबियल व अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म खूप उपयुक्त ठरतात. तसेच त्वचा मॉइश्चराइज होण्यासाठीही मध उपयुक्त ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्याठिकाणी मध लावावे. यामुळे पायाच्या भेगा व जखमा दूर होण्यास मदत होते.

२) खोबरेल तेल

खोबरेल तेलातील विशेष गुणधर्मामुळे त्वचा मॉइश्चराइज होत असते. त्यामुळे जळवातामुळे पायाला भेगा पडल्यास तेथे खोबरेल तेल लावावे. यामुळे भेगा भरून येण्यास व भेगा पडलेली डेड स्किन निघून जाण्यास, त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत होते.

३) कडुनिंबाचा रस

जळवातमध्ये पायाला भेगा पडल्यास कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्याचा रस काढून लावल्यास भेगा लवकर कमी होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

6 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

6 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

6 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

7 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

8 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

8 तास ago