सकाळी उठल्यानंतर दूध पिऊन तुम्ही शाळेत जाता. मग मधल्या सुट्टीत आईने दिलेला डवा खाता. तरी परत शाळा सुटल्यावर घरी जाईपर्यंत तुमच्या पोटात कावळे ओरडायला लागतात. हा अनुभव तुम्ही सगळ्यांनीच घेतला असेल.
दुपारी भरपेट जेवल्यावर पुन्हा रात्री भूक लागतेच. असे का होते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. माणसाच्या मेंदू मध्ये भूक, तहान याची केंद्रे असतात. पोटात काही नसताना पोटातील (जठरातील) चेतातंतू मार्फत ती संवेदना मेंदूच्या भुकेच्या केंद्रापर्यंत जाते. त्याच वेळी जठरात स्रवलेले हायड्रोक्लोरीक आम्ल, गॅस्ट्रीन व पूर्ण पचनसंस्थेत निर्माण होणारी इतर संप्रेरके यांच्या एकत्रित परिणामामुळे भुकेची जाणीव होते. कितीही भूक लागली तरी आपण ठराविक अन्नच खाऊ शकतो. त्यामुळेच आपल्याला रोज जेवावे लागते.
जठरात अन्न दोन ते अडीच तास राहते. जठराच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसरणामुळे अन्न घुसळले जाते व त्यावर आम्ल आणि विकरांची प्रक्रिया होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही प्रमाणात पचलेले हे अन्न लहान आतड्यात जाते. जठरात अन्न काही ठराविक काळच (दोन ते अडीच तास) राहते. त्यानंतर जठर रिकामे होते.
जठर रिकामे झाल्यानंतर व अन्न पचनसंस्थेत पुढे सरकल्यानंतर आपल्याला पुन्हा भूक लागते. साहजिकच जेवल्यानंतर काही तासांनी पुन्हा भूक लागते. अन्नाचे पूर्ण पचन होऊन चोथा (विष्ठा) बाहेर पडायला १६ ते १८ तास लागतात.
(शोशल मीडियावरुन साभार)
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…