आरोग्य

जेवल्यानंतर काही तासांनी भुक का लागते?

सकाळी उठल्यानंतर दूध पिऊन तुम्ही शाळेत जाता. मग मधल्या सुट्टीत आईने दिलेला डवा खाता. तरी परत शाळा सुटल्यावर घरी जाईपर्यंत तुमच्या पोटात कावळे ओरडायला लागतात. हा अनुभव तुम्ही सगळ्यांनीच घेतला असेल.

दुपारी भरपेट जेवल्यावर पुन्हा रात्री भूक लागतेच. असे का होते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. माणसाच्या मेंदू मध्ये भूक, तहान याची केंद्रे असतात. पोटात काही नसताना पोटातील (जठरातील) चेतातंतू मार्फत ती संवेदना मेंदूच्या भुकेच्या केंद्रापर्यंत जाते. त्याच वेळी जठरात स्रवलेले हायड्रोक्लोरीक आम्ल, गॅस्ट्रीन व पूर्ण पचनसंस्थेत निर्माण होणारी इतर संप्रेरके यांच्या एकत्रित परिणामामुळे भुकेची जाणीव होते. कितीही भूक लागली तरी आपण ठराविक अन्नच खाऊ शकतो. त्यामुळेच आपल्याला रोज जेवावे लागते.

जठरात अन्न दोन ते अडीच तास राहते. जठराच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसरणामुळे अन्न घुसळले जाते व त्यावर आम्ल आणि विकरांची प्रक्रिया होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही प्रमाणात पचलेले हे अन्न लहान आतड्यात जाते. जठरात अन्न काही ठराविक काळच (दोन ते अडीच तास) राहते. त्यानंतर जठर रिकामे होते.

जठर रिकामे झाल्यानंतर व अन्न पचनसंस्थेत पुढे सरकल्यानंतर आपल्याला पुन्हा भूक लागते. साहजिकच जेवल्यानंतर काही तासांनी पुन्हा भूक लागते. अन्नाचे पूर्ण पचन होऊन चोथा (विष्ठा) बाहेर पडायला १६ ते १८ तास लागतात.

(शोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

10 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

14 तास ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

15 तास ago

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…

16 तास ago

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…

16 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…

16 तास ago