मुंबई: पद्मश्री शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी शांतादेवी पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत सहजीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. “डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासारख्या कर्तृत्ववान पतीची साथ लाभणे हे माझे भाग्य होते. त्यांनी आयुष्यभर माणसं जोडली, अनेकांचे संसार उभे केले आणि असंख्य लोकांना आधार दिला. त्यांच्या पत्नी म्हणून हे सर्व जवळून पाहण्याची संधी मिळाली, याचा कायम अभिमान राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सुमारे सात दशकांचा सहजीवनाचा प्रवास त्यांच्या निधनाने थांबला असला, तरी त्यांच्या आठवणी कायम सोबत राहतील, असे सांगताना शांतादेवी पाटील भावूक झाल्या.
प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेल्या शांतादेवींनी संसार, मुलांचे संगोपन आणि संस्कारांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यामुळेच डॉ. डी. वाय. पाटील यांना शिक्षण, समाजकारण आणि राजकारणात पूर्णवेळ कार्य करता आले.
त्या म्हणाल्या, “साहेब सतत मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी कामानिमित्त दौऱ्यावर असायचे. त्यामुळे मुलांची जबाबदारी माझ्यावर होती. मी कधीही त्याबद्दल तक्रार केली नाही. मुलांना चांगले शिक्षण, उत्तम संस्कार आणि शिस्त देण्याचा प्रयत्न केला. साहेब बाहेर असले तरी त्यांचे मुलांकडे कायम लक्ष असायचे. पाचही मुलांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे, कष्टाची किंमत समजून घ्यावी आणि शिस्तीने आयुष्य जगावे, यावर त्यांचा नेहमी भर होता.”
शांतादेवी पाटील यांनी व्यक्त केलेल्या या भावना डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कर्तृत्वामागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सहचारिणीचे योगदान अधोरेखित करणाऱ्या ठरल्या आहेत. त्यांच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले.
मुंबई: मुंबईच्या विकासाचा पाया केवळ उंच इमारती, सागरी सेतू आणि आधुनिक रस्त्यांवर नसून भूमिगत पाणीपुरवठा,…
पक्ष-चिन्ह वादाच्या निर्णायक टप्प्यात शिंदेंचा सातारा दौरा; संघटनात्मक बैठका आणि जिल्हा बँक निवडणुकीवर चर्चा होण्याची…
युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे; सुनेत्रा पवार यांचा संघटनबांधणीला वेग मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या…
'भटकलेले पक्षी पुन्हा घरट्यात परतले'; जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार…
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली असली, तरी देशातील पेट्रोल आणि…
ओबीसी आरक्षण, मोहन भागवतांचा युवक संवाद आणि आदिवासी विभागाच्या ६०० कोटींच्या थकीत देण्यांवरही सरकारवर हल्लाबोल…