महाराष्ट्र

बांधकामांवरील हवा गुणवत्ता सेन्सरची घोषणा हवेतच; पंधरा दिवसांतही अंमलबजावणी नाही

पुणे: शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एक हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर-आधारित हवा गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसविणे अनिवार्य करण्याची घोषणा महापालिकेने केली होती. मात्र पंधरा दिवस उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याचे समोर आले आहे.

शहरात धूलिकणांची पातळी वाढत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांनुसार बांधकाम क्षेत्रातील धूळ नियंत्रणावर विशेष भर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) च्या अहवालानुसार शहरातील धूळ प्रदूषणात बांधकाम क्षेत्राचा सुमारे २३ टक्के वाटा आहे.

त्यामुळे महापालिकेने हद्दीतील पाच हजार चौरस मीटर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या निवासी, व्यावसायिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सेन्सर-आधारित हवा गुणवत्ता देखरेख प्रणाली बसविणे बंधनकारक केले होते. तसेच बांधकामस्थळी एलईडी इंडिकेटर प्रणाली बसवून धूळ प्रदूषणाची तीव्रता दर्शविण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कामगारांना हवेची गुणवत्ता आणि प्रदूषणाची पातळी समजून तातडीने उपाययोजना करणे शक्य झाले असते.

ही यंत्रणा न बसविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी वर्षभरापूर्वी दिला होता. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) यांनी निश्‍चित केलेल्या निकषांनुसारच बांधकाम व्यावसायिकांनी सेन्सर खरेदी करून बसविणे अपेक्षित आहे, जेणेकरून महापालिका प्रशासनाला थेट देखरेख ठेवता येईल. शहरात पाच हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या बांधकामांची संख्या ६७८ आहे, तर त्याखालील क्षेत्रफळावरील बांधकामांची संख्या सुमारे १८ हजारांपर्यंत पोहोचली आहे. तरीही प्रशासनाकडून या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची टीका होत आहे.

दरम्यान, दैनिक ‘सकाळ’ने ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्तमालिकेतून शहरातील वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौरांनी ही अट एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या बांधकामांनाही लागू करण्याचे आदेश दिले होते. महापालिका प्रशासनाने त्याबाबत घोषणा देखील केली; मात्र प्रत्यक्षात त्यावर कोणतीही अंमलबजावणी झालेली नसल्याने प्रदूषण नियंत्रणाबाबत प्रशासनाची उदासीनता समोर येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

5 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

10 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

10 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

10 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

10 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

12 तास ago