मुंबई: मराठी मनोरंजनविश्वात लवकरच ‘सनई चौघडे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मालिकेत काही नवे चेहरे झळकणार आहेत. त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे अभिनेत्री चिन्मयी साळवी, जी मालिकेत ‘शर्वरी परब’ ही मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. बेधडक, स्पष्टवक्ती आणि बिनधास्त स्वभावाची शर्वरी ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहील, असा विश्वास चिन्मयीने व्यक्त केला आहे.
आपल्या भूमिकेबद्दल सांगताना चिन्मयी म्हणाली की, “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शर्वरी प्रमिला सुभाष परब आहे. शर्वरी ही अत्यंत निर्मळ, स्वच्छंद आणि आनंदी स्वभावाची मुलगी आहे. ती आपल्या कुटुंबाशी खूप जोडलेली असून जशास तसे बोलणारी, स्पष्ट मत मांडणारी आहे. तिला पाठीमागून बोलणं अजिबात आवडत नाही. कुटुंबावर तिचा खूप जीव आहे. शर्वरी ही ग्रॅज्युएट मुलगी असून एम.डी.ची ‘रोज क्वीन’ आहे. ती नोकरीच्या शोधात असली तरी नोकरी मिळेपर्यंत आपल्या आईच्या टिफिन व्यवसायात मदत करत असते.”
या भूमिकेसाठी कॉल आल्यावर आपला आनंद गगनात मावेनासा झाल्याचेही चिन्मयीने सांगितले. “‘वागळे की दुनिया’ ही हिंदी मालिका तब्बल पाच वर्ष केल्यानंतर मला शर्वरीच्या भूमिकेसाठी कॉल आला. मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. माझी इच्छा होती की मराठी मालिकेत अशी भूमिका करावी जी प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील,” असे ती म्हणाली. मालिकेत शर्वरी आणि जय ही दोन अगदी विरुद्ध स्वभावाची पात्रे असणार असून त्यांची भेट प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरेल, असेही तिने नमूद केले.
शर्वरीच्या भूमिकेसाठी फारशी विशेष तयारी करावी लागली नाही, कारण स्वतःचा स्वभावही त्या व्यक्तिरेखेसारखाच असल्याचे चिन्मयीने सांगितले. मात्र या भूमिकेसाठी तिने खास करून स्कूटी चालवायला शिकले. “शर्वरी आईच्या टिफिन व्यवसायासाठी स्कूटीवरून टिफिन डिलिव्हरी करते. मला आधी स्कूटी चालवायला भीती वाटायची, पण या भूमिकेसाठी मी स्कूटी शिकले आणि आता गर्दीतही आत्मविश्वासाने चालवू शकते,” असे ती हसत म्हणाली.
शूटिंगदरम्यानचा एक खास अनुभवही तिने सांगितला. हॉस्पिटलमध्ये शूटिंग सुरू असताना अचानक एका सुमारे पन्नास वर्षांच्या महिलेने पुढे येत चिन्मयीसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. प्रोडक्शन टीमने परवानगी दिल्यानंतर त्या महिलेने फोटो काढला आणि मालिकेच्या यशासाठी सर्व कलाकारांना मनापासून आशीर्वाद दिले. “शूटच्या पहिल्याच दिवशी असा सुंदर अनुभव मिळाला. तो मी कधीच विसरणार नाही,” असे चिन्मयीने सांगितले.
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…