मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच महायुतीतील मंत्र्यांवर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. यात संजय शिरसाट, संजय राठोड, योगेश कदम यांच्या नावांचा समावेश होता. एकीकडे हे आरोप सुरु असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे हेही वादात सापडले.
आता महायुती सरकारमध्ये खातेबदल करत माणिकराव कोकाटेंना दणका दिल्यानंतर महायुती सरकारची पुन्हा एकदा धडधड वाढण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी शुक्रवारी (ता. 1 ऑगस्ट) एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण महायुतीतील आणखी एका मंत्र्यांची कुंडली काढली असल्याचा दावा केला आहे. यामुळे महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्या म्हणाल्या, योगेश कदम यांच्याविरोधात माझ्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पुरावे आहेत. कदम यांची सगळी कुंडली काढली असून हे सर्व पुरावे घेऊन आपण त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढणार आहोत, असंही दमानिया यांनी इशारा दिला आहे.
त्या म्हणाल्या,योगेश कदम यांच्या योग सिद्धी, सिद्धयोग इत्यादी नावाच्या ज्या काही कंपन्या आहेत, त्याची सर्व माहिती घेतली आहे. तसेच त्यांचे ज्या ज्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरु आहेत, याव्यतिरिक्त रत्नागिरीत त्यांच्या ज्याकाही शैक्षणिक संस्था चालतात त्याचीही माहिती काढल्याचंही दमानिया म्हणाल्या.
या सगळ्या कंपन्या आणि संस्थांमधील मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार माझ्यापर्यंत आला आहोत. हे सर्व एकत्र करुन आपण न्यायालयीन लढाई लढणार आहोत”, असे अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार असल्याचा आरोप परब यांनी विधानपरिषदेत केला होता. परब यांनी यावेळी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मुंबईच्या कांदिवली भागात सावली बार आहे. तिथे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. या कारवाईत 22 बारबालांसह 22 ग्राहक व 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा दाखल करून आढळलेल्या ग्राहकांवर गुन्हा दाखल केला आहे.
गंभीर गोष्ट म्हणजे या बारचे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. या महिला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत,असंही परब यांनी म्हटलं होतं. यानंतर आता योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झालेली असताना त्यांनी ॲार्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टोबार आणि हॉटेल परवाना कदम कुटुंबियांनी ठेवला असल्याची माहिती समोर येत आहे. याचवरुन आता यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…