महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर संभ्रम कायम; निर्णय एकत्र बसूनच; सुनील तटकरे

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोरात सुरू आहेत.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलिनीकरणासाठी पुढाकार घेण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र अजित पवार गटातील नेत्यांमध्ये या विषयावर संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार की नाही, हा प्रश्न सध्या कळीचा ठरला आहे.

दरम्यान, दोन्ही गटांकडून विलिनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार १२ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर झालेल्या चर्चांची माहिती देणार असल्याचे जाहीर केले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सुनेत्रा पवार यांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला, तर आम्हाला विलिनीकरण करावेच लागेल, असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले होते.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील तटकरे म्हणाले, “हसन मुश्रीफ हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र आम्ही सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. या विषयावर सखोल चर्चा केली जाईल. १० तारखेला मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी (सुनेत्रा पवार) उपस्थित राहतील, तेव्हा या विषयावर चर्चा होऊ शकते. त्यानंतर त्या दिल्लीतही जाऊ शकतात. राष्ट्रपती, पंतप्रधान यांची भेट, तसेच राज्यसभेच्या सदस्या म्हणून असलेल्या संवैधानिक जबाबदाऱ्या या सर्व बाबींचा विचार करून योग्य वेळेला निर्णय घेतला जाईल.”

विलिनीकरणाचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेणार का, की पक्षाच्या कोअर कमिटीत पुन्हा चर्चा होणार, या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले,“२०२३ मध्ये जो निर्णय घेतला, तो आम्ही सर्वांनी एकत्र बसून घेतला होता. वहिनी या आमच्या विधिमंडळ पक्षाच्या आणि पक्षाच्या नेत्या आहेत. त्यामुळे या विषयावर एकत्र चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस हा दादांचा राजकीय परिवार आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतरही दादांनी दाखवलेली राजकीय इच्छाशक्ती आणि राज्यातील जनतेने दिलेला ७३ टक्के स्ट्राईक रेट हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णयही योग्यपणानेच घेऊ.”

एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर सध्या अनिश्चितता कायम असून पुढील काही दिवसांत होणाऱ्या बैठका आणि नेत्यांच्या भूमिकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

4 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

10 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

10 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

10 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

10 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago