औरंगाबाद: मागील वर्षी भारतात कापसाचे दर १४ हजारांवर पोहोचल्याने मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनऐवजी कापसाला पसंती दिली. मात्र, फेब्रुवारी संपत आला तरी कापसाला योग्य तो भाव मिळत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच, कापसाचे दर लवकरच वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची तेजी वाढली आहे, देशातल्या कापसालाही बांगलादेशातून मोठी मागणी होत आहे. तसेच चीनकडूनही कापूस खरेदीसाठी हालचाली सुरु आहेत. त्यामुळे या आठवड्यात कापूस बाजाराने काही उभारी घेतल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून ८ हजारांवर असलेला कापूस बाजार भाव आता ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहचला आहे.
विदर्भातील कापसाचे पंढरी समाजाला जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कापसाचा भाव ८ हजार ३१५ पासून ८ हजार ८५० इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी बघता, यंदा कापसाचा सरासरी दर ८,५०० ते ९,५०० रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…