औरंगाबाद: मागील वर्षी भारतात कापसाचे दर १४ हजारांवर पोहोचल्याने मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनऐवजी कापसाला पसंती दिली. मात्र, फेब्रुवारी संपत आला तरी कापसाला योग्य तो भाव मिळत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच, कापसाचे दर लवकरच वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची तेजी वाढली आहे, देशातल्या कापसालाही बांगलादेशातून मोठी मागणी होत आहे. तसेच चीनकडूनही कापूस खरेदीसाठी हालचाली सुरु आहेत. त्यामुळे या आठवड्यात कापूस बाजाराने काही उभारी घेतल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून ८ हजारांवर असलेला कापूस बाजार भाव आता ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहचला आहे.
विदर्भातील कापसाचे पंढरी समाजाला जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कापसाचा भाव ८ हजार ३१५ पासून ८ हजार ८५० इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी बघता, यंदा कापसाचा सरासरी दर ८,५०० ते ९,५०० रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…
पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…
कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…
तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…