महाराष्ट्र

शिरुर येथील साहिल बांदल कडून युरोपातील सर्वोच्च शिखर सर

बेस कॅम्प वर फडकवला 115 फूट लांबीचा तिरंगा

शिरुर (अरुणकुमार मोटे): युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूसवर भारतामार्फत इतिहास घडला असून शिरूर येथील गिर्यारोहक साहिल बांदल याने ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत हे शिखर सर केले आहे. गिर्यारोहनासारख्या साहसी क्रीडा प्रकारात फार कमी लोक असताना आपला ठसा उमटवत साहिलने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलिमांजारो पाठोपाठ युरोपातील सर्वोच्च शिखर एलब्रुस सर केले.

एलब्रूस बेस कॅम्प वर भारताचा ११५ फूट लांबीचा तिरंगा फडकवण्याच्या विक्रमही साहिलने केला आहे.साहिलच्या या कामगिरीचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. सदर मोहीम ११ ऑगस्ट रोजी सुरू झाली होती.या मोहिमेदरम्यान साहिलला माऊंट एल्ब्रस येथील लहरी हवामान तसेच हाडे गोठविणारी थंडी वेगाने वाहणारे वारे या सर्व आव्हानांना तोंड देत शिखर सर करावे लागले.मात्र साहिलने या सर्व आव्हानांचा सामना करत इतरांच्या तुलनेत कमी वेळेत शिखर सर केले.

माऊंट एलब्रूस जगातील सात खंडातील सात सर्वोच्च शिखरांपैकी 5व्या क्रमांकाचे शिखर असून याची उंची १८५१० फूट आहे. जॉर्जीया देशाच्या सरहद्दीपासून २o किलोमीटर अंतरावर हे शिखर वसलेले असून पृथ्वीवरील सर्वात उंच असलेल्यापैकी एक निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे.

माऊंट एल्ब्रस हे शिखर सर करण्यासाठी गिर्यारोहण मधील कौशल्ये यांचे प्रशिक्षण घ्यावे लागते.तसेच खडतर शारीरिक श्रम करावे लागतात.त्याचबरोबर मानसिक क्षमतांचाही कस लागतो. यापूर्वी साहिलने दक्षिण आफ्रिका येथील माऊंट कीलीमांजारो या शिखरावर भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकविण्याचा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे.तसेच वेगवेगळ्या हिमालयीन मोहिमांमध्ये देखील त्याने उठावदार कामगिरी केली आहे.

साहिलचे यश प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ठ असून ३६०एक्सप्लोरर मार्फत त्याने एलब्रूस शिखर सर करून साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अतिशय खडतर वातावरणात व धाडसाने हे शिखर सर करून संपूर्ण महाराष्ट्रापुढे त्याने एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

8 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

17 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

17 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

18 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

23 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

23 तास ago