महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मराठीच्या विविध बोली भाषा व लिपी याविषयीचे प्रदर्शन…

ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: २७ फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जो सर्व महाराष्ट्रात ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांच्या दादर पूर्व येथील संदर्भ विभागात मराठी भाषेच्या विविध बोली, लिपी- इत्यादी विषयांवर विविध ग्रंथ व लेख यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले क “‘हे भाषाविषयक प्रदर्शन पाहून समाधान झाले, निरनिराळ्या बोली, लिप्या यातून भाषा कशी प्रवाही होत जाते हे कळते.सातशे वर्षांपूर्वी भाषेचा प्रश्न येत नव्हता. माणूस प्रवास करीत अगदी कन्याकुमारी ते कश्मीर चालला तरी भाषा येत नाही म्हणून त्याचं अडलं नाही. ब्रिटिशांनी सुधारणा करायला सुरुवात केल्यावर भाषेवर बंधनं आली भाषा बंदिस्त होऊ लागली. आपलं मातृभाषेवर प्रेम हवं. कोणत्याही भाषेतील 500वाक्यं आली की काहीही अडचण येत नाही.मराठी माणूस जिथे गेला तिथे सोबत मराठीतील शब्दही गेले.

राज्याराज्यांत असलेल्या मराठी भाषकांचा सरकारने भाषांतरासाठी उपयोग करून घ्यावा.’ अशी सूचनाही त्यांनी केली. याप्रसंगी साहित्यिक रंगनाथ पाठारे, जयप्रकाश सावंत, प्रफुल्ल शिलेदार, प्रमोद मुनघाटे, संस्थेचे विश्वस्त प्रताप आसबे, रवींद्र गावडे, उमा नाबर, विनायक परब,अभ्यासक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

“ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ लावलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे सर यांच्या हस्ते व्हावं हा अनोखा सुवर्णयोग आज ग्रंथालयात आला याचा मनस्वी आनंद आहे” असं संदर्भ कार्यवाह उमा नाबर म्हणाल्या. हे प्रदर्शन २८ फेब्रुवारी ते ४ मार्च पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत पाहता येईल. तरी अभ्यासकांनी, साहित्यप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

3 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

11 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

12 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

13 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

17 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

17 तास ago