महाराष्ट्र

पतसंस्थांचे कामकाज पारदर्शकपणे चालण्यासाठी तज्ञ समिती नेमा; बाळासाहेब थोरात

मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेत पतसंस्थांचा मोठा वाटा राहिला आहे. ही पद्धत पुढे जात असतांना या क्षेत्रात अनेक नवीन प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. बँकेचे चेअरमन, मॅनेजर हे काही निर्णय परस्पर घेत असतात, संचालक मंडळाला याबाबत कोणतीही कल्पना नसते. कल्पना नसतांना व माहिती नसतांना अनवधानाने ते प्रस्तावावर सह्या करतात व नंतर न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतात अशी परिस्थिती महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून एक तज्ञ समितीची स्थापना करणे गरजेचे आहे, असे काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत पतसंस्थांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, यावेळी ते म्हणाले की, पतसंस्था ही चळवळ महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात पतपुरवठा करणारी एक महत्वाची चळवळ आहे. सर्वसामान्य माणसांच्या विकासाची व प्रगतीची ही चळवळ आहे. यात एका विचाराची माणसे एकत्र येत पतसंस्था सुरु करतात, त्यात पैसे ठेवतात व गरजुंना कर्ज स्वरुपात वाटप करतात. त्यामुळे उद्योगालाही मोठी चालना मिळते. पतसंस्थांच्या बाबतीत तज्ञ समिती नेमून या समितीवर सदस्य म्हणून सहकार व आर्थिक क्षेत्रातील माहिती असणार्‍या तज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी. या समितीमार्फत पतसंस्थांबाबत महत्वाच्या सूचना व निर्णय घेणे गरजेचे आहे. यामुळे निर्माण होणार्‍या अडचणी कळतील व त्यावर तातडीने उपाययोजना करता येतील.

सदर समितीने पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींना संरक्षण देणे, ऑडीटचा दर्जा देतांना योग्य तपासणी व निकष आहे की नाही याची पडताळणी करणे गरजेचे आहे. यासाठी ही तज्ञ समिती काम करेल व कामकाजात पारदर्शकता वाढेल. या सर्व गोष्टींवर सरकारने लक्ष घालून निर्णय घेणे अपेक्षित आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

6 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

7 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

8 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

9 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

10 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

10 तास ago