औरंगाबाद: मराठवाड्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४१ वरील कन्नड तालुक्यातील औट्रम घाटात चार बोगदे बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकत्याच दिल्लीमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या बोगद्यांपैकी एकातून रेल्वे तर दुसऱ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४१ वरील वाहतूक सुरू होणार आहे. उर्वरित दोन बोगदे सुरक्षेसाठी राखीव ठेवले जाणार आहेत.
७,००० कोटींचा प्रकल्प
या बोगद्यांच्या बांधकामासाठी एकूण ७,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च दोन्ही मंत्रालयांमध्ये अर्धा-अर्धा वाटून घेण्यात येणार आहे.
३,५०० कोटी रुपये – रेल्वे मंत्रालय
३,५०० कोटी रुपये – NHAI
या प्रकल्पासाठी लवकरच DPR (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात येणार असून, त्यासाठी देखील खर्च वाटून घेण्याचे निश्चित झाले आहे. काही महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
बोगद्यांची रचना आणि कार्यपद्धती
एकूण चार बोगदे – एक रेल्वेसाठी, एक महामार्गासाठी आणि दोन सुरक्षिततेसाठी
१५ किलोमीटर लांबीचे बोगदे
डोंगरात खोदून सुरक्षित व जलद दळणवळण मार्ग उपलब्ध करणार
रेल्वेमार्गामुळे छत्रपती संभाजीनगर – चाळीसगाव – सोलापूर असा नवा कनेक्शन तयार होणार
वाहतुकीत होणारा मोठा बदल
सध्या औट्रम घाटात बोगदा नसल्यामुळे वाहनचालकांना ११० किमीचा वळसा घालावा लागतो. यामुळे इंधनाचा खर्च, वेळेची नासाडी तसेच वाहतूककोंडी सारख्या समस्या सतत उद्भवत होत्या. या बोगद्यांमुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर अपघातदरही लक्षणीय घटेल.
औद्योगिक प्रगतीस चालना
प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.
किर्लोस्कर व इतर नामवंत कंपन्यांचे उद्योग
वाहतूक खर्चात कपात
स्थानिक रोजगाराच्या संधी वाढणार
चाळीसगाव रेल्वेमार्गालाही चालना
या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्गालाही गती मिळणार आहे. बोगद्यांच्या DPR साठी रेल्वे मंत्रालयाने आपले आदेश दिले असून, लवकरच त्याची कार्यवाही सुरू होईल.
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…