महाराष्ट्र

झेपत नसेल तर गृहमंत्रीपद सोडा! महाराष्ट्राची अब्रू वेशीवर; जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका

मुंबई: बदलापूरमध्ये एका चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली असल्याची तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सरकार गुन्हेगारांसमोर हतबल झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार होत असताना मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना झोप कशी लागते? बदलापुरात यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. मात्र त्या प्रकरणात सरकारने दोषींवर ठोस कारवाई न करता महत्वाच्या आरोपींना मोकळे सोडले. जनतेच्या तीव्र आंदोलनानंतर सरकार जागे झाले, पण पुढे त्या प्रकरणाचे काय झाले हे सर्व राज्याने पाहिले आहे, असे ते म्हणाले.

भाजपा व संघाशी संबंधित शाळेत घडलेल्या प्रकरणात शाळेच्या अध्यक्ष व सचिवावर कारवाई करण्यात आली नाही. पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल असतानाही शाळेच्या सचिवाला भाजपाने स्वीकारलेला नगरसेवक केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. प्रशासन निष्क्रिय असल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर भाष्य करताना सपकाळ म्हणाले की, मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप असूनही पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा मंत्र्यांसह सरकार कसे चालते, असा प्रश्न उच्च न्यायालयालाही विचारावा लागतो, ही गंभीर बाब आहे.

अंकिता भंडारी प्रकरण, उन्नाव बलात्कार, महिला कुस्ती खेळाडूंवरील लैंगिक अत्याचार यांसह अनेक प्रकरणांत भाजपाशी संबंधित लोकांची नावे समोर आली, पण कारवाई मात्र झाली नाही. राज्यात वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, लँड माफिया यांना मोकळे रान मिळाले असून महिला व मुलींची सुरक्षा पूर्णपणे रामभरोसे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बदलापूरच्या ताज्या प्रकरणात सरकारने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल आणि जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

1 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

6 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

6 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

6 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

6 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

6 तास ago