मुंबई: जनता दल सेक्युलर महाराष्ट्र राज्य पक्षाच्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र शासन व वीज महामंडळ यांच्या 37% प्रस्तावीत वीज दरवाढीच्या निर्णयाविरोधात वीज बिलाची होळी करण्यात आली. सरकार वीज बिल वाढीचा निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे समाजातील गरीब जनतेच्या खिशाला झळ पोचून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे व या 37% वीज दरवाढीचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडणार आहे.
या विरोधात शासनाने हा निर्णय मागे घेऊन मागील वीज दराप्रमाणे वीजदर आकारावा,शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा, पत्रकार यांच्यावर होणारे हल्ले याविषयी कडक कायदा करावा, अशा विविध मागण्या घेऊन जनता दल सेक्युलर यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मोर्चा मध्ये महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवी भिलाणे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष सुहास बने, महासचिव ज्योती बडेकर, अपर्णा दळवी, स्मृती जाधव, हरिदास सागरे, जमील उद्दीन शेख, सुरेंद्र कुंज्जीकर , ताराबाई मेश्राम, भगवान साळवी, आदी उपस्थित होते.
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…