मुंबईत “जनता दल (सेक्युलर) च्या वतीने वीज बिलाची होळी

महाराष्ट्र

मुंबई: जनता दल सेक्युलर महाराष्ट्र राज्य पक्षाच्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र शासन व वीज महामंडळ यांच्या 37% प्रस्तावीत वीज दरवाढीच्या निर्णयाविरोधात वीज बिलाची होळी करण्यात आली. सरकार वीज बिल वाढीचा निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे समाजातील गरीब जनतेच्या खिशाला झळ पोचून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे व या 37% वीज दरवाढीचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडणार आहे.

या विरोधात शासनाने हा निर्णय मागे घेऊन मागील वीज दराप्रमाणे वीजदर आकारावा,शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा, पत्रकार यांच्यावर होणारे हल्ले याविषयी कडक कायदा करावा, अशा विविध मागण्या घेऊन जनता दल सेक्युलर यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मोर्चा मध्ये महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवी भिलाणे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष सुहास बने, महासचिव ज्योती बडेकर, अपर्णा दळवी, स्मृती जाधव, हरिदास सागरे, जमील उद्दीन शेख, सुरेंद्र कुंज्जीकर , ताराबाई मेश्राम, भगवान साळवी, आदी उपस्थित होते.