पुणे: वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या जिद्द, ताकद आणि उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावत कुस्तीप्रेमींची मने जिंकली. या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
स्पर्धेतील उपविजेता महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच दमदार कामगिरीतून प्रेक्षकांची दाद मिळवली. अंतिम लढत अत्यंत चुरशीची आणि थरारक ठरली. गादी विभागातील विजेता हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सदगीर यांनी सरशी साधत मानाची गदा आपल्या नावावर केली.
या अंतिम झुंजीने कुस्ती परंपरेची उंची अधिक वाढवली असल्याचे गौरवोद्गार सुनेत्रा अजित पवार यांनी काढले. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक आणि रांगडा क्रीडाप्रकार असून, या परंपरेतूनच खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. आजचे तरुण पैलवान ही परंपरा पुढे नेत आहेत, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेदरम्यान अनेक रोमांचक सामने रंगले आणि उत्कृष्ट नियोजनामुळे संपूर्ण स्पर्धेला विशेष उठाव मिळाला. यावेळी सुनेत्रा अजित पवार यांनी विजेते व उपविजेते खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…