महाराष्ट्र

शासणाच्या आडमुठ्या व जाचक अटींमुळे विहीरीच्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित

शिरुर (अरुणकुमार मोटे): पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या विहीर, गाई गोठा, शेळी शेड या योजना मोठया प्रमाणात राबवल्या जात आहे.परंतू काही जाचक अटींमुळे ही योजना तालुक्यासह जिल्हयात पुर्णत्वाला जाऊ शकली नाही.

विहीरीच्या लाभाची योजना राबवण्यासाठी तलाठी दाखला लागतो. तलाठी दाखला देत नसल्यामुळे ही योजना मंजूर होत नाही. तसेच ग्रामपंचायतीचा मागील वर्षाचा ठराव लागतो. गरजू लाभार्थ्याच्या शेत जमिनीच्या जवळपास 500 फुटापेक्षा थोड्याफार फरकाने कमी जास्त अंतरावर दुसऱ्या शेतकऱ्याची विहीर असल्यास सदर गरजू शेतकऱ्याला सदर सिंचन विहिरीच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. या तिचकट, जाचक ,आडमुठया निकषांच्या भुमिकेमुळे विहीरींच्या लाभाच्या योजना धुळ खात पडल्या असून त्यावर शासणाने योग्य तो मार्ग काढण्याची मागणी शिरुर तालुक्यातील शेतकरी करत आहे.

बेरोजगाराला रोजगार उपलब्ध होण्यासाठी या योजनेंतर्गत केंद्र शासन 100 दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व 100 दिवस प्रति कुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते. प्रति कुटुंब 100 दिवसावरील प्रत्येक मजुराच्या, मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते. 13 जून 2022. च्या शासन निर्णयानुसार. विहीर मंजुरी साठी लागणारे दाखले तलाठी यांचेकडून घेणे गरजेचे आहे काय? असल्यास शिरूर तालुक्यातील तलाठी संघटनेकडून सदर दाखले दिले जात नाहीत

सदर दाखल्यांना पर्याय म्हणून लाभार्थी यांचे सदर दाखल्यांबाबतचे स्टॅम्प पेपर वरील स्वयंघोषणापत्र / प्रतिज्ञापत्र देखील चालत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या विहिरी कशा मंजूर होणार?एकुणच शासण तोंडात घास घालते अन् मानेत बुक्का घालून बाहेर काढते. या वाक्याचा प्रत्यय या योजनेच्या जाचक अटींमुळे येत आहे. यावर योग्य मार्ग न काढल्यास पंचायत समिती व शिरुर तहसिल कार्यालयासमोर शेतकरी निषेध मोर्चा काढणार असल्याचे काही सामाजिक संघटनांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

18 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

18 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

18 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

18 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

20 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

20 तास ago