Manoj Jarange Patil
शिरूर (तेजस फडके) : सोशल मीडियावर मराठा आंदोलनाला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही? असा मेसेज व्हायरल झाला आहे. संबंधित आरोप मनोज जरांगे यांनी खोडून काढला आहे. माध्यमं घाबरणारे व्यासपीठ नसून, त्यांनी सुरवातीपासून मोठ्या ताकतीने आपल्या आंदोलनाला प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाने गैरसमज करून घेण्याची गरज नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील म्हणाले, ‘मराठा समाजाला माझं आवाहन आहे की, सर्वच न्यूज चॅनलनी आपल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली आहे. मराठा आंदोलन दाखवण्यासाठी माध्यमांनी कोणतीही काटकसर केली नाही. कारण प्रामाणिकपणा आणि जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे. त्यांच्यावर दबाव असेल आणि त्यामुळे ते आपलं आंदोलन दाखवत नाही असे मला वाटत नाही. मराठा समाज सर्वच न्यूज चॅनलवर प्रेम करतात. त्यामुळे एखाद्यावेळी आंदोलन दिसलं नाही म्हणून काहीतरी करायची मराठा समाजाला गरज नाही. सर्वच न्यूज चॅनलच्या पाठीशी मराठा समाज उभा आहे. त्यामुळे मराठा समाजाने मनात काही गैरसमज आणण्याची गरज नाही. माध्यमं ताकतीने मराठा आंदोलन दाखवत आहे आणि पुढेही दाखवतील. माध्यमं घाबरणारं व्यासपीठ नाही. त्यामुळे त्यांना सर्वांनी मिळून साथ द्यायला हवी.’
‘मराठा समाज एकत्र आला आहे. संख्या लाखांची आहे. समाज चांगला आशीर्वाद देत आहे. शेतकरी व्यावसायिक आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. आजपासून मराठा सर्व्हेक्षण होत असून, हे आरक्षण टिकणार आहे का? याच स्पष्टीकरण द्या, आम्ही हे नाकारलेले नाही. 54 लाख लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र दिले पाहिजे. अधिकारी सर्व्हेक्षण करतायत ही चांगली गोष्ट आहे. क्युरेटीव्ह पिटीशन आणि मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. पण, हे टिकणारे आहे की नाही याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे. आरक्षण टिकणारे आहे की नाही हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आम्हाला परवानगी देवो अथवा न देवो आम्ही आमरण उपोषणसाठी बसणार आहे. आम्ही कायद्याने परवानगी मागीतली आहे. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत,’ असेही जरांगे पाटील म्हणाले.
पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…