महाराष्ट्र

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार टीका केली आहे. “नारी शक्ती वंदन”च्या नावाखाली प्रत्यक्षात “सत्ता शक्ती वंदन” सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

२८ सप्टेंबर २०२३ रोजी १०६ वी घटनादुरुस्ती करून महिला आरक्षण कायदा मंजूर झाला, हे स्वागतार्ह असले तरी त्याचे संपूर्ण श्रेय भाजप घेते आहे, ही राजकीय ढोंगबाजी असल्याचे मातेले म्हणाले. या विधेयकाला ४५४ खासदारांनी समर्थन दिले असून केवळ २ जणांनी विरोध केला होता. त्यामुळे INDIA आघाडीचाही त्यात मोठा वाटा असून भाजपने एकट्याने श्रेय घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा त्यांनी गंभीरतेने मांडला. जनगणना आणि परिसीमन (Delimitation) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महिला आरक्षण लागू होणार असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. “आज घोषणा आणि उद्या विसर” हीच भाजपची कार्यपद्धती असल्याचे ते म्हणाले.

परिसीमनानंतर लोकसभा जागा वाढण्याची शक्यता असून त्यामध्ये आरक्षण लागू करून राजकीय गणित साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “हे महिला सक्षमीकरण नसून सत्ता टिकवण्याचे राजकारण आहे,” असा आरोप त्यांनी केला.

तसेच, काही खासदारांनी “आताच ५० टक्के महिला आरक्षण लागू करा” असे खुले आव्हान दिले असताना भाजपकडून ठोस उत्तर न आल्याची टीकाही त्यांनी केली. यामागील हेतू विलंब करून राजकीय श्रेय घेण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिला आरक्षणाचा वापर भावनिक मुद्दा म्हणून केला जात असून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कोणतीही घाई नसल्याचे त्यांनी सांगितले. “महिलांच्या नावाने टाळ्या घ्या आणि जागा वाढवून सत्ता वाचवा,” असा भाजपचा साधा राजकीय फॉर्म्युला असल्याची टीका त्यांनी केली.

महिला आरक्षणाचा कायदा स्वागतार्ह असला तरी तो तात्काळ लागू न करणे, परिसीमनाच्या आड लपवणे आणि राजकीय श्रेय लाटणे यामुळे भाजपचा दुहेरी चेहरा उघड होत असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.

ॲड. अमोल मातेले

प्रवक्ता व युवक मुंबई अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

21 मिनिटे ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

27 मिनिटे ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

33 मिनिटे ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

3 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

14 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

14 तास ago