महाराष्ट्र

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार टीका केली आहे. “नारी शक्ती वंदन”च्या नावाखाली प्रत्यक्षात “सत्ता शक्ती वंदन” सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

२८ सप्टेंबर २०२३ रोजी १०६ वी घटनादुरुस्ती करून महिला आरक्षण कायदा मंजूर झाला, हे स्वागतार्ह असले तरी त्याचे संपूर्ण श्रेय भाजप घेते आहे, ही राजकीय ढोंगबाजी असल्याचे मातेले म्हणाले. या विधेयकाला ४५४ खासदारांनी समर्थन दिले असून केवळ २ जणांनी विरोध केला होता. त्यामुळे INDIA आघाडीचाही त्यात मोठा वाटा असून भाजपने एकट्याने श्रेय घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा त्यांनी गंभीरतेने मांडला. जनगणना आणि परिसीमन (Delimitation) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महिला आरक्षण लागू होणार असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. “आज घोषणा आणि उद्या विसर” हीच भाजपची कार्यपद्धती असल्याचे ते म्हणाले.

परिसीमनानंतर लोकसभा जागा वाढण्याची शक्यता असून त्यामध्ये आरक्षण लागू करून राजकीय गणित साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “हे महिला सक्षमीकरण नसून सत्ता टिकवण्याचे राजकारण आहे,” असा आरोप त्यांनी केला.

तसेच, काही खासदारांनी “आताच ५० टक्के महिला आरक्षण लागू करा” असे खुले आव्हान दिले असताना भाजपकडून ठोस उत्तर न आल्याची टीकाही त्यांनी केली. यामागील हेतू विलंब करून राजकीय श्रेय घेण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिला आरक्षणाचा वापर भावनिक मुद्दा म्हणून केला जात असून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कोणतीही घाई नसल्याचे त्यांनी सांगितले. “महिलांच्या नावाने टाळ्या घ्या आणि जागा वाढवून सत्ता वाचवा,” असा भाजपचा साधा राजकीय फॉर्म्युला असल्याची टीका त्यांनी केली.

महिला आरक्षणाचा कायदा स्वागतार्ह असला तरी तो तात्काळ लागू न करणे, परिसीमनाच्या आड लपवणे आणि राजकीय श्रेय लाटणे यामुळे भाजपचा दुहेरी चेहरा उघड होत असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.

ॲड. अमोल मातेले

प्रवक्ता व युवक मुंबई अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

46 मिनिटे ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

9 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

10 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

11 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

15 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

16 तास ago