महाराष्ट्र

नटराजन यांची नोटीसच रद्द! राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्या, भाजपावर ‘सीटचोरी’चा आरोप

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपाने आणि निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ज्या नोटीसच्या आधारे नटराजन यांचा अर्ज बाद करण्यात आला होता, ती नोटीसच तेलंगणातील न्यायालयाने रद्द केल्याने आता राज्यसभा निवडणूक रद्द करून नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने ‘व्होटचोरी’नंतर आता ‘सीटचोरी’ करण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला. मिनाक्षी नटराजन यांनी माहिती लपवल्याचा आरोप करून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. मात्र, ज्या फॉर्म २६ मध्ये माहिती न दिल्याचा आक्षेप घेण्यात आला, त्या फॉर्ममध्ये संबंधित माहिती भरण्यासाठी कोणताही कॉलम नसल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. दरम्यान, नटराजन यांच्याशी संबंधित नसल्याचे स्पष्ट करत तेलंगणातील न्यायालयाने संबंधित नोटीसच रद्द केली आहे. त्यामुळे अर्ज रद्द करण्याचा आधारच संपुष्टात आला असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार, असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला.भाजपामध्ये नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्यावी, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरही सरकारवर टीका केली. महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून जाचक अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप त्यांनी केला. संपूर्ण कर्जमाफी आणि सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.रोहित पवार यांनी केलेल्या मागण्या रास्त असून सरकारने त्या तातडीने मान्य कराव्यात. त्यांच्या उपोषणस्थळी जाऊन आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते तथा माजी आमदार अनंत गाडगीळ उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

5 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago