महाराष्ट्र

नटराजन यांची नोटीसच रद्द! राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्या, भाजपावर ‘सीटचोरी’चा आरोप

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपाने आणि निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ज्या नोटीसच्या आधारे नटराजन यांचा अर्ज बाद करण्यात आला होता, ती नोटीसच तेलंगणातील न्यायालयाने रद्द केल्याने आता राज्यसभा निवडणूक रद्द करून नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने ‘व्होटचोरी’नंतर आता ‘सीटचोरी’ करण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला. मिनाक्षी नटराजन यांनी माहिती लपवल्याचा आरोप करून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. मात्र, ज्या फॉर्म २६ मध्ये माहिती न दिल्याचा आक्षेप घेण्यात आला, त्या फॉर्ममध्ये संबंधित माहिती भरण्यासाठी कोणताही कॉलम नसल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. दरम्यान, नटराजन यांच्याशी संबंधित नसल्याचे स्पष्ट करत तेलंगणातील न्यायालयाने संबंधित नोटीसच रद्द केली आहे. त्यामुळे अर्ज रद्द करण्याचा आधारच संपुष्टात आला असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार, असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला.भाजपामध्ये नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्यावी, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरही सरकारवर टीका केली. महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून जाचक अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप त्यांनी केला. संपूर्ण कर्जमाफी आणि सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.रोहित पवार यांनी केलेल्या मागण्या रास्त असून सरकारने त्या तातडीने मान्य कराव्यात. त्यांच्या उपोषणस्थळी जाऊन आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते तथा माजी आमदार अनंत गाडगीळ उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

18 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

18 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

18 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

18 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

23 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

23 तास ago