महाराष्ट्र

अजितदादांच्या विमान अपघातावरून राजकारण तापलं; संजय राऊत–रोहित पवारांवर भाजपाचा हल्लाबोल

मुंबई: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि रोहित पवार यांच्यावर “प्रसिद्धी स्टंट” केल्याचा आरोप करत प्रखर टीका केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात बोलताना बन म्हणाले, “अजितदादांच्या निधनानंतर काही नेते रोज उठून तेच मुद्दे मांडत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातामागचे सत्य समोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार गंभीरपणे प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच डीजीसीए स्तरावर चौकशी सुरू आहे. सीबीआय चौकशीच्या मागणीवरही सकारात्मक विचार सुरू आहे.”

‘महायुतीत होते, ते विसरू नका’

राऊतांनी “अजितदादांची महाविकास आघाडीत येण्याची इच्छा होती” असा दावा केल्याबाबत बन यांनी पलटवार केला. “अजितदादांनी भाजपा महायुतीची साथ दिली, उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आणि एनडीएमध्ये सामील झाले होते. हे भान ठेवावे,” असे ते म्हणाले. “बाष्कळ दावे करण्यापेक्षा राऊतांनी उबाठा गटाची प्रवक्तेगिरी बंद करून वेब सीरीजचे लेखन करावे,” असा टोमणाही त्यांनी लगावला.

ब्लॅक बॉक्स सुरक्षित; थोडा वेळ द्या

अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती देत बन म्हणाले, “त्यातून सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा.” रोहित पवारांनी हा मुद्दा राज्यसभेत उचलण्यासाठी राऊतांचा पुढाकार घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी सवाल केला, “शरद पवार गटाचे खासदार लोकसभा-राज्यसभेत असताना त्यांच्या माध्यमातून मुद्दा का मांडला गेला नाही?”

‘एफआयआर नव्हे, अपघाती मृत्यू अहवाल’

मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याच्या मागणीवरूनही बन यांनी रोहित पवारांवर टीका केली. “अपघातानंतर एफआयआर नव्हे, तर अपघाती मृत्यू अहवाल नोंदवला जातो. तो यापूर्वीच दाखल झाला आहे. चौकशी संबंधित यंत्रणा करत आहेत, तरीही प्रसिद्धीसाठी उतावळेपणा केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात वातावरण तापले असून, अपघाताच्या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

8 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

16 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago