संभाजीनगर: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. आता शाळांमधील शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, वॉचमन अशा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती कायमस्वरूपी न होता कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत याची अधिकृत घोषणा केली आहे.
काय आहे नवीन भरती पद्धत
यापुढे सर्व शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले जातील.
जे कर्मचारी सध्या कार्यरत आहेत, त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत काम करता येईल.
मात्र, त्यांच्या रिक्त जागांवर पुढे कंत्राटी कर्मचाऱ्यांचीच भरती केली जाईल.
घटती विद्यार्थ्यांची संख्या आणि सरकारची भूमिका
राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.
UDISE प्रणालीच्या आकडेवारीनुसार हा ट्रेंड दिसून आला आहे.
त्यामुळेच सरकारने शिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि खर्च नियंत्रित ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधान परिषदेत गदारोळ, विरोधक आक्रमक
या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला.
मुलींची संख्या अनेक शाळांमध्ये अधिक असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांमुळे शाळेचा कारभार अधिक शिस्तबद्ध होतो, असा विरोधकांचा युक्तिवाद आहे.
त्यामुळे शाळांमध्ये शिपाई आणि सहाय्यक पदे
कायमस्वरूपी भरली जावीत अशी मागणी त्यांनी लावून धरली.
या निर्णयाचे संभाव्य परिणाम
खर्चावर नियंत्रण मिळवता येईल.
पण कर्मचाऱ्यांची अस्थिरता शाळांच्या व्यवस्थापनावर परिणाम करू शकते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित होऊ शकतात
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…