महाराष्ट्र

आष्टीतील श्रीक्षेत्र तारकेश्वर गडावर धक्कादायक घटना

महंत आदिनाथ महाराजांनी स्वतःवर वार करून घेतले जखमी

आष्टी: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील महिंदा गावातील श्रीक्षेत्र तारकेश्वर गड येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. गडाचे प्रमुख महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवर शस्त्राने वार करून स्वतःला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

माहितीनुसार, ही घटना सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्या दिवशी महाराजांनी गडावर आलेल्या भक्तांना आणि सेवकांना काही वेळ खोलीबाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर ते स्वतः खोलीत गेले. काही वेळातच त्यांनी स्वतःवर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात येताच गडावरील सेवकांनी तातडीने दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले आणि त्वरित रुग्णालयात दाखल केले.

प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉ. हर्षवर्धन तनवर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या माहितीनुसार शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पुढील आठ दिवस महाराजांना पूर्ण विश्रांती देण्यात येणार आहे. या कालावधीत कोणालाही त्यांना भेटण्यास परवानगी दिली जाणार नाही.

दरम्यान, चिंतेत असलेल्या भक्तांना दिलासा देण्यासाठी आदिनाथ महाराजांनी स्वतः व्हिडिओ संदेश जारी केला. “माझी तब्येत आता चांगली आहे, काळजी करू नका. मी लवकरच गडावर परत येईन,” असा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला.

या घटनेची माहिती मिळताच काही राजकीय व सामाजिक नेत्यांनीही रुग्णालयात भेट देत महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वारकरी संप्रदायात मोठा मान असलेल्या महाराजांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

आदिनाथ महाराज शास्त्री यांचा बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो भक्तांमध्ये प्रभाव आहे. त्यामुळे या घटनेमुळे भक्तपरिवारात चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, गड परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून महाराज लवकर बरे व्हावेत यासाठी भक्तांकडून प्रार्थना केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

44 मिनिटे ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

9 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

10 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

11 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

15 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

16 तास ago