महाराष्ट्र

आष्टीतील श्रीक्षेत्र तारकेश्वर गडावर धक्कादायक घटना

महंत आदिनाथ महाराजांनी स्वतःवर वार करून घेतले जखमी

आष्टी: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील महिंदा गावातील श्रीक्षेत्र तारकेश्वर गड येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. गडाचे प्रमुख महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवर शस्त्राने वार करून स्वतःला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

माहितीनुसार, ही घटना सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्या दिवशी महाराजांनी गडावर आलेल्या भक्तांना आणि सेवकांना काही वेळ खोलीबाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर ते स्वतः खोलीत गेले. काही वेळातच त्यांनी स्वतःवर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात येताच गडावरील सेवकांनी तातडीने दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले आणि त्वरित रुग्णालयात दाखल केले.

प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉ. हर्षवर्धन तनवर आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या माहितीनुसार शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पुढील आठ दिवस महाराजांना पूर्ण विश्रांती देण्यात येणार आहे. या कालावधीत कोणालाही त्यांना भेटण्यास परवानगी दिली जाणार नाही.

दरम्यान, चिंतेत असलेल्या भक्तांना दिलासा देण्यासाठी आदिनाथ महाराजांनी स्वतः व्हिडिओ संदेश जारी केला. “माझी तब्येत आता चांगली आहे, काळजी करू नका. मी लवकरच गडावर परत येईन,” असा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला.

या घटनेची माहिती मिळताच काही राजकीय व सामाजिक नेत्यांनीही रुग्णालयात भेट देत महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वारकरी संप्रदायात मोठा मान असलेल्या महाराजांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

आदिनाथ महाराज शास्त्री यांचा बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो भक्तांमध्ये प्रभाव आहे. त्यामुळे या घटनेमुळे भक्तपरिवारात चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, गड परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून महाराज लवकर बरे व्हावेत यासाठी भक्तांकडून प्रार्थना केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

12 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

1 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

1 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

1 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 दिवस ago