मुंबई: बोरीवली तहसीलदार कार्यालय येथील नागरी सेतू केंद्रात अधिवास प्रमाणपत्र (डॉमिसिले सर्टिफिकेट) अर्ज उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्यानंतर आज सकाळी सुमारे ११.३० वाजता भेट दिली असता केंद्रात छापील अर्ज नसून समोरच्या झेरॉक्स दुकानातून अर्ज घ्यावेत, असे सांगण्यात आले.
यावेळी जवळच असलेल्या आशापुरा जंबो झेरॉक्स येथून १० रुपयांना अर्ज विकत घ्यावा लागला. संबंधित अर्जावर २३ एप्रिल २०२४ अशी तारीख असून त्याची झेरॉक्स प्रत देण्यात आल्याचे निदर्शनास आले.
मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २०२५ मध्ये या नागरी सेतू केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, आजतागायत केंद्रात छापील अर्ज उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या डिजिटल आणि सुलभ सेवा देण्याच्या दाव्यांवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, नुकतेच विधानसभेत अस्लम शेख यांनी तहसीलदार कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, दलालांचे वाढते जाळे आणि सर्वसामान्यांना उत्पन्न व अधिवास दाखले मिळण्यात होणारी दिरंगाई याबाबत आवाज उठविला होता.या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, तसेच विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
ॲड. संदेश कोंडविलकर
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…