महाराष्ट्र

मणिपूर महिला अत्याचार विरोधात मौन निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन

मुंबई: मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर मौन निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मुंबई विभागातील मंत्रालया जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रमुख उपस्थित होते.

मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे तसेच महिलांवर अत्याचारी मोठ्या प्रमाणात होत आहेत या अत्याचाराविरोधात आज मुंबई विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबईतील 6 जिल्ह्यांमध्ये मौन निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मंत्रालया जवळी महात्मा गांधी यांच्या पुतळा जवळ आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव तसेच ओबीसी चे अध्यक्ष राजा राजपूतकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मणिपूर तीन महिन्यापासून जळत आहे. पण देशाच्या पंतप्रधानांना लक्ष द्यायला वेळ नाही. मणिपूरमध्ये महिलेची निर्वस्त्र धिंड काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा व्हिडिओ पाहून मन सुन्न झाले. ही घटना एका महिलेपुरती मर्यादीत नसून हा समस्त महिला वर्गावरचा अत्याचार आहे.

मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून राज्य सरकार व केंद्र सरकारला परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मौन निषेध आंदोलन मुंबईतील सहा जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आले होते. दक्षिण मुंबई, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर, ईशान्य मुंबई या वेगवेगळ्या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले आहे. या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

10 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

10 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

10 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

10 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

10 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

10 तास ago