महाराष्ट्र

ब्रेकअपच्या रागातून सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून बहिणीची ४० वार करून हत्या; आईवरही प्राणघातक हल्ला

मुरादाबाद (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या सख्ख्या बहिणीची चाकूने तब्बल ४० वेळा वार करून निर्घृण हत्या केली असून आईवरही प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक मल्होत्रा नावाच्या तरुणाने आपली जुळी बहीण हिमशिखा मल्होत्रा हिच्यावर चाकूने एकामागून एक ४० पेक्षा अधिक वार करून हत्या केली. या हल्ल्यानंतर त्याने आई नीलिमा मल्होत्रा यांनाही सोडले नाही. हार्दिकच्या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हार्दिकचे पुण्यातील एका तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर प्रेमसंबंध होते. सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. मात्र हे नाते आपल्या आई आणि बहिणीमुळे तुटले असा संशय हार्दिकला होता. याच रागातून त्याने हा भयंकर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेकअपनंतर हार्दिक नैराश्यात गेला होता. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता, मात्र नोकरी सोडून युट्युबवर करिअर करण्याचा प्रयत्न करत होता. घरच्यांकडून त्याला समजावण्याचा प्रयत्न होत होता; मात्र हार्दिकला तो हस्तक्षेप वाटत होता.

६ मार्च २०२६ रोजी आई कामावर असताना हार्दिकने घरी असलेल्या बहिणीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. त्यानंतर आईला “सरप्राईज” देण्याच्या बहाण्याने ऑफिसमधून घरी बोलावून त्यांच्यावरही हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला असून पोलिसांनी आरोपी हार्दिकला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

2 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

2 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

2 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

12 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

16 तास ago