महाराष्ट्र

बोरीवली तहसिल मधील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करा

एका दाखल्यासाठी विद्यार्थ्यांना मोजावे लागतात ३ ते ४ हजार रुपये आमदार अस्लम शेख यांचा आरोप

मुंबई: बोरीवली तहसिल कार्यालयातील आपले सरकार केंद्र दिड महिना बंद राहणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळाली असून हे केंद्र जर एवढ्या कालावधीसाठी बंद राहिलं तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे असा सवाल विचारत हे आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी आमदार अस्लम शेख यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली.

शेख म्हणाले, बोरीवली तालुक्याच्या तहसिल कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र दिड महिना बंद राहणार अशी माहिती मला प्राप्त झाली आहे.

आपले सरकार सेवा केंद्राच्या बाहेर VLE केंद्रांची यादी लावण्यात आली आहे. पण या केंद्रावर दाखले काढून देण्यासाठी भरमसाठ रक्कम आकारण्यात येते, अशा तक्रारी मला प्राप्त होत आहेत.जे दाखले तहसिल कार्यालयाच्या आपले सरकार केंद्रांवर ₹३४ एवढ्या कमी किमतीत मिळतात त्या दाखल्यांसाठी ३००० ते ४००० रुपये विद्यार्थ्यांकडून आकारले जात आहेत.

जुन व जुलै हा शैक्षणिक प्रवेशांचा कालावधी असतो. विद्यार्थांना फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक दाखले लागत असतात. मग अचानक आपले सरकार सेवा केंद्र का बंद करण्यात आले? गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे…

सर्व काही व्यवस्थित चालू असताना ऐन शैक्षणिक प्रवेशाच्या कालावधीत निवदा प्रक्रिया राबवून नव्या कंपनीला आपले सरकार सेवा केंद्राचे काम दिल्यामुळे हे सर्व घडतय. विद्यार्थ्यांचे भविष्य दाखले न मिळाल्याने उद्ध्वस्त होईल. त्यांचे प्रवेश नाकारले जातील अशी भिती व्यक्त करत, बोरीवली तहसिल कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार शेख यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

20 मिनिटे ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

3 तास ago

केस गळतीवर घरगुती उपाय

1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा…

3 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची…

3 तास ago

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

15 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

18 तास ago