महाराष्ट्र

राज्याची तिजोरी जनतेचीच; शेतकरी, कष्टकरी आणि बहिणींसाठीच खर्च होणार

लाडकी बहिण योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सडेतोड प्रत्युत्तर

पाचोरा: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची कला मला आहे. त्यामुळेच जनतेच्या मनातले सरकार स्थापन करता आले. त्यामुळे पाचोरा येथील जनता ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहून पाचोरा नगर परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

राज्याची तिजोरी ही शेतकरी कष्टकरी आणि लाडक्या बहिणींची आहे हा पैसा जनतेचाच आहे आणि जनतेसाठीच खर्च करायला पाहिजे. म्हणूनच निधीची कमतरता कधीच पडू देणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

 

पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आयोजित प्रचार सभेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या सभेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता पाटील आणि २४ नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे बोलत होते. विविध जाती-धर्मातील लोकांनी एकजूट दाखवत विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिल्यास पाचोर्‍याचा कायापालट होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या २ तारखेला धनुष्यबाणाला मतदान करून सुनीता पाटील व सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले.

 

नगरविकास, उद्योग आणि शेतकरी योजनांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, पाचोर्‍यात एमआयडीसीसाठी जमीन मंजूर आहे आणि आता उद्योग आणण्याची प्रक्रिया एका महिन्यात सुरू होईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असून, येथील युवक बेरोजगार राहणार नाहीत, असा शब्दही त्यांनी दिला. “चुनावी जुमला नाही, दिलेला शब्द पाळणारे सरकार आम्ही आहोत,” असेही त्यांचे स्पष्ट वक्तव्य होते.

शिंदे यांनी त्यांच्या सरकारमध्ये घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची आठवण करून दिली. मुलींसाठी उच्च शिक्षण शंभर टक्के मोफत करण्याचा निर्णय, मुलांच्या दस्तावेजांमध्ये आईचे नाव अनिवार्य करण्याचा निर्णय, ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे चार कोटी नागरिकांना थेट लाभ देणे, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साडेचारशे कोटींची मदत देऊन हजारो रुग्णांचे प्राण वाचवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत राज्यात विकासकामांना वेग आला असून, “जनतेसाठी सत्ता आणि सेवा हा आमचा हेतू आहे; सत्ता आमचा हक्क नाही, सेवा हीच आमची ओळख आहे,” असेही शिंदे म्हणाले. भाषणाच्या शेवटी पुन्हा एकदा भावना जागवत उपमुख्यमंत्री म्हणाले की, “धनुष्यबाण हा बाळासाहेबांचा अभिमान आहे. या चिन्हाला मत म्हणजे विकासाला मत. 24 पैकी 24 जागा शिवसेनेच्या झोळीत गेल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

6 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

9 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 दिवस ago