महाराष्ट्र

काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचे दोन दिवसीय शिबिर टिळक भवनात संपन्न

प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह विविध विषयातील तज्ञांचे शिबिरार्थींना मार्गदर्शन

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्या दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे करण्यात आले होते. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिबीराचे उद्घाटन केले तर प्रभारी रमेश चेन्नथला यांनी देखील व्हिडिओ काँफ्रन्सच्या माध्यमातून संवाद साधला.

माजी खासदार कुमार केतकर यांनी समकालीन राजकीय परिस्थिती या विषयावर बोलताना देशातील लोकशाही समोर आज हुकूमशाहीचे मोठे आव्हान आहे. काँग्रेस पक्षाने लोकशाहीच्या संवर्धनासाठी बलिदान दिले आहे. याच बलिदानाचा वारसा घेवून काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी आता सक्षमपणे मैदानात उतरावे असे आवाहन केतकर यांनी केले. डॉ. विश्वास उटगी यांनी बँक खासगीकरण हा भांडवलदारांचे खिसे भरण्याचा कार्यक्रम असल्याचे सांगून मोदी सरकारच्या जनविरोधी आर्थिक धोरणांचा समाचार घेतला. ज्येष्ठ नेते आमदार अमित देशमुख यांनी देखील शिबिरार्थ्यांसोबत संवाद साधून पक्ष वाढवण्याचे आवाहन केले.

शाहीर संभाजी भगत यांनी सांस्कृतिक राजकारण या विषयाची मांडणी करताना आजवर पुरोगामी पक्ष, संघटनांनी सांस्कृतिक राजकारणाकडे दुर्लक्ष केले त्याचा गैरफायदा प्रतिगामी शक्तींनी घेतला त्यामुळे आगामी काळात सांस्कृतिक राजकारण हे जोरकसपणे करण्याविषयी मार्गदर्शन केले.

आशुतोष शिर्के यांनी नव्या मानसिकतेची सुरुवात ही विजय साकार करण्याची पूर्व अट असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपयशाची आणि टिकेची भीती न बाळगता वास्तवाचा स्वीकार करून पुढील वाटचाल केली पाहिजे हे सांगितले. तसेच निमिष साने आणि संदीप ढवळे पाटील यांनी काँग्रेस पक्षांर्गत नेतृत्व विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या नेतृत्व संगम, शक्ती अभियान, जय जवान जय किसान अशा विविध उपक्रमांची माहिती दिली.

संवाद स्वरुपात हे सत्र पार पडले. सायंकाळी सर्वधर्मीय सामूहिक प्रार्थना झाली. शिबिराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात श्रमदानाने झाली. शिबिरार्थींनी टिळक भवन परिसराची स्वच्छता करून कचरा गोळा केला. त्यानंतर राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी भाषा आणि राजकारण या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. मराठी भाषा संवर्धन आणि राजकारण हे हातात हात घालूनच होवू शकते. या दिशेनेच महाराष्ट्र धर्म आपण जागवू शकतो आणि तसे झाले तरच महाराष्ट्राचा गायपट्टा होण्यापासून वाचवू शकतो यावर पवार यांनी जोर दिला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा त्यासाठी प्रेरणादायी आहे तो आपण वाचला पाहिजे असे प्रा. पवार म्हणाले.

श्यामसुंदर सोन्नर यांनी संतसाहित्य आणि संविधान या विषयाची मांडणी करताना संपूर्ण संत साहित्याचा आशय हाच भारतीय संविधानाचा गाभा आहे. समता, लोकशाही आणि सामाजिक न्याय हीच संताची भूमिका राज्य घटनेच्या अंमलबजावणीतून अपेक्षित आहे याविषयी विस्ताराने मांडणी केली.

प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकारणाचे विकेंद्रीकरण हा काँग्रेस पक्षाचा धोरणात्मक कार्यक्रम आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामसभांच्या बळकटीकरणातून सर्व समाजघटकांच्या विकासाची दिशा निश्चित होवू शकेल त्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच परिकल्पनेतील भारत या विषयी देखील सपकाळ यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस गुरबचनसिंग बच्चर, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी उपस्थित होते. तर सांगली जिल्यातील राष्ट्र सेवा दलाच्या पथकाने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

27 मिनिटे ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

2 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

7 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

7 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

7 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

7 तास ago