मुंबई: मुंबईची शान आणि सर्वसामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेली बेस्ट आज गंडांतराच्या उंबरठ्यावर उभी आहे.
पालिकेच्या प्रशासनाने घेतलेल्या तुघलकी निर्णयामुळे बेस्टच्या भाड्यात थेट दुप्पट वाढ करण्यात आली आहे, आणि तीही केवळ काही मोजक्या कंत्राटदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी!
मुंबईकरांचे खिसे रिकामे करायचे आणि ठराविक कंत्राटदारांची खाती भरायची, असा स्पष्ट अजेंडा पालिका प्रशासनाने उघडपणे स्वीकारल्याचे हे धक्कादायक उदाहरण आहे.
सरासरी तिकीट व मासिक पासांचे दर दुप्पट करण्याचा निर्णय म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या बेस्टवर थेट आर्थिक आघातच केला आहे.
आता या दरवाढीला समर्थन द्यायचं म्हणून सांगितलं जातंय, “आर्थिक तोटा झाकण्यासाठी हा निर्णय आवश्यक आहे!”
असेल तर मग, बेस्टच्या तिकीट काढताना थेट बँक लोनही मंजूर करायला एखादा काउंटर उघडावा, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी लगावला आहे.
महागाईच्या प्रचंड तडाख्याने होरपळलेल्या सामान्य मुंबईकरांवर बेस्टच्या दरवाढीचा आणखी एक बोजा लादण्याचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे.
पालिकेच्या अपयशाची किंमत भरण्याची जबाबदारी मुंबईकरांवर कशी टाकली जाऊ शकते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
बेस्ट ही केवळ एक लाल बस नव्हे, ती आहे – प्रत्येक मुंबईकराच्या संघर्षाची, स्वप्नांची आणि धडपडीची साथीदार!
आज त्या साथीदारावरच गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे सर्वस्वी निषेधार्ह आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुंबईच्या वतीने आम्ही स्पष्ट इशारा देतो
जर हा अन्यायकारक दरवाढीचा निर्णय तातडीने मागे घेण्यात आला नाही, तर मुंबईभर जोरदार व अनोख्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.त्या आंदोलनाच्या प्रचंड जनआक्रोशामुळे पालिका प्रशासनालाही लवकरच लोन काढण्याची वेळ येईल, असा ठाम इशारा ॲड. अमोल मातेले यांनी दिला.
मुंबई वाचवायची आहे,
बेस्ट वाचवायची आहे,
सर्वसामान्यांचा खिसा वाचवायचा आहे.
बेस्ट वाचवा! खिसा वाचवा! मुंबई वाचवा
जय मुंबई! जय महाराष्ट्र
ॲड. अमोल मातेले
मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…