महाराष्ट्र

शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदेची? सर्वोच्च निकालाची तारीख अखेर ठरली

मुंबई: महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या शिवसेनेमधील राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची तारीख समोर आली आहे. मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळापासून सुरु असलेल्या न्यायालयीन लढल्याला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झाला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यासंदर्भातील खटल्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात कधी लागणार याची तारीख निश्चित झाली आहे.

बंड अन् संघर्ष

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकारमधील 40 आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या मदतीने सत्तेत आलेल्या सरकारने उर्वरित कार्यकाळ पूर्ण करुन आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील युती सरकार सत्तेत आलेलं आहे. असं असतानाही पक्षावरील हक्कासंदर्भातील निकाल अद्याप लागलेला नाही. मागील साडेतीन वर्षांपासून या प्रकरणावर केवळ तारखा पडत असून निकाल लागलेला नाही.

निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निकाल दिलेला असला तरी त्याविरोधातही ठाकरेंच्या सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली. या प्रकरणातील सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरु आहे. या प्रकरणावरुन शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेंचा हक्क असणार की उद्धव ठाकरेंचा हे कोणत्या तारखेला ठरणार हे निश्चित झालं आहे.

कधी लागणार निकाल? तारीख काय?

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे – शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, 14 जुलै 2025 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील तारीख निश्चित करत प्रकरण 20 ऑगस्ट 2025 रोजी यादीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आता संगणक निर्मित यादीनुसार ही सुनावणी 8 ऑक्टोबर 2025, बुधवारी पुन्हा होणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून झाल्यावर कोर्ट अंतिम निर्णय देईल. त्यामुळे शिवसेना कोणाची, याबाबतचा फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे.

राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी कधी?

न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच याचा फैसला होणार आहे. ते दुसऱ्या घटनापीठाचे सदस्य असल्याने सुनावणी लांबणीवर गेली आहे. 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरेंची थेट सरन्यायाधीशांना विनंती

शिवसेनेची सुनावणी गेल्या 3 वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे शिवसेनेची सुनावणी तातडीनं घेण्याची विनंती उद्धव ठाकरेंनी केलीय सरन्यायाधीश भूषण गवई यांना केलीय. तीन वर्षांपासून तारीख पे तारीख मिळतेय. त्यामुळे सुनावणी घेऊन न्याय देण्याची विनंती ठाकरेंनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

24 तास ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

2 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

2 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

3 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

3 दिवस ago