राजकीय

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ना नाम बचा, ना निशान…!

औरंगाबाद: निवडणूक आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली आहे. त्याना शिवसेना नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबर पर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे.

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावरुन शिंदे – ठाकरे गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे. आयोगाने सांगितले की, अंधेरी पूर्व जागेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी एकालाही ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे

या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या चिन्हांच्या यादीतून दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे निवडण्यास सांगण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. हा अंतरिम आदेश लागू होईपर्यंत उद्धव ठाकरे- शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाला 10 ऑक्टोबरपर्यंत नवीन निवडणूक चिन्ह तसेच पक्षाच्या नावाची माहिती द्यावी लागणार आहे.

दोन्ही गटांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळी नावे तसेच चिन्हे वाटप करणार असून, निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयापर्यंत हे काम सुरु राहणार आहे. आगामी पोटनिवडणुकीत दोन्ही गट एकाच पक्षाचे नाव, चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

4 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

4 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

5 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

10 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

10 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

10 तास ago