नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी तिथे उपस्थित उद्योजकांना अनेक धडे दिले. गडकरी यांनी आपल्या भाषणात रिचर्ड निक्सन यांचा हवाला देत म्हटले आहे की, माणूस हरल्यावर संपत नाही, तर निघून गेल्यावर संपतो. जो कोणी व्यवसाय, समाजकारण किंवा राजकारणात आहे, त्याच्यासाठी मानवी संबंध ही सर्वात मोठी शक्ती आहे.
नितीन गडकरी म्हटले आहे की, कधीही वापरु नये आणि फेकून देऊ नये. अच्छे दिन असोत किंवा वाईट दिवस, एकदा कुणाचा हात धरला की सोडू नका. केवळ उगवत्या सूर्याची पूजा करु नये, मावळत्या सूर्याचीही पूजा करावी. मी विहिरीत उडी मारुन मरेन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही.
गडकरींनी आठवण करुन दिली की ते विद्यार्थी नेते असताना काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी त्यांना चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये येण्यास सांगितले होते. तेव्हा मी श्रीकांतना सांगितले की, मी विहिरीत उडी मारून मरेन, पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, कारण मला काँग्रेस पक्षाची विचारधारा आवडत नाही.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…