पाबळ मधील खळबळजनक घटना
शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी मध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीला मारहाण करत त्याला पाण्याच्या टाकीत टाकल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन श्रीधर वसंत बगाटे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी येथे राहणारे संतोष बगाटे हे त्यांचा गोठ्यात झोपलेले असताना श्रीधर बगाटे तेथे आला आणि गोठ्यात ठेवलेला पाण्याचा जग व ग्लास घेऊन जात असताना संतोष यांनी त्याला जग का घेऊन जातो जग नेऊ नकोस, असे म्हटले असता श्रीधर याने शिवीगाळ, दमदाटी करत संतोषला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली.
दरम्यान संतोषने आरडाओरडा केल्याने श्रीधर याने संतोषला शेजारी असलेल्या जनावरांच्या पाण्याच्या टाकीत टाकले. यावेळी संतोषचा आरडाओरडा ऐकून शेजारील गणेश टेमकर सदर ठिकाणी आला त्याने संतोषला बाहेर काढले, तेव्हा तू माझ्या नादी लागला तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली.
याबाबत संतोष केरबा बगाटे (वय ४५) रा. पिंपळवाडी पाबळ (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी श्रीधर वसंत बगाटे (वय २८) रा. पिंपळवाडी पाबळ (ता. शिरूर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नवनाथ नाईकडे हे करत आहे.
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…