शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून व्यक्तीला पाण्याच्या टाकीत टाकले अन…

पाबळ मधील खळबळजनक घटना

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी मध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीला मारहाण करत त्याला पाण्याच्या टाकीत टाकल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन श्रीधर वसंत बगाटे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी येथे राहणारे संतोष बगाटे हे त्यांचा गोठ्यात झोपलेले असताना श्रीधर बगाटे तेथे आला आणि गोठ्यात ठेवलेला पाण्याचा जग व ग्लास घेऊन जात असताना संतोष यांनी त्याला जग का घेऊन जातो जग नेऊ नकोस, असे म्हटले असता श्रीधर याने शिवीगाळ, दमदाटी करत संतोषला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली.

दरम्यान संतोषने आरडाओरडा केल्याने श्रीधर याने संतोषला शेजारी असलेल्या जनावरांच्या पाण्याच्या टाकीत टाकले. यावेळी संतोषचा आरडाओरडा ऐकून शेजारील गणेश टेमकर सदर ठिकाणी आला त्याने संतोषला बाहेर काढले, तेव्हा तू माझ्या नादी लागला तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली.

याबाबत संतोष केरबा बगाटे (वय ४५) रा. पिंपळवाडी पाबळ (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी श्रीधर वसंत बगाटे (वय २८) रा. पिंपळवाडी पाबळ (ता. शिरूर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नवनाथ नाईकडे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

8 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

13 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

13 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

13 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

13 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

15 तास ago