राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अनोखे कीर्तन
शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून अनोख्या पद्धतीने कीर्तन संपन्न झाले असल्याने विद्याधाम मध्ये टाळमृदुंगाचा गजर झाला आहे.
कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने विद्यालयाचे माजी विद्यार्थी ह.भ.प. विश्वास महाराज गाडगे यांचे कीर्तन आयोजित केले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोले, संचालक शहाजी दळवी, प्राचार्य अनिल शिंदे, पर्यवेक्षक साहेबराव आंधळे यांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले.
दरम्यान कीर्तनकार विश्वास महाराज गाडगे यांनी कीर्तनातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचा आढावा घेतला. तर विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून चारित्र्यसंपन्न व निर्मल जीवन कसे जगावे तसेच राजमाता जिजाऊ यांच्याकडून आदर्श मुले कधी घडवावीत याचे ध्येय समोर ठेवावे. त्यांचे विचार आजही काळाशी सुसंगत आहेत हा ह्या महान व्यक्तिमत्त्वांचा दुरदर्शीपणा असल्याचे सांगितले. विद्यालयाने किर्तनासारख्या उपक्रमाचे आयोजन करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे असे माजी सरपंच रामदास मांदळे यांनी सांगितले.
किर्तनासाठी ह. भ. प. बाबूराव महाराज तळोले, नाथा मिडगुले, आकाश महाराज पाटील, स्वप्नील टाकळकर, सुभाष महाराज जैद, नितीन महाराज सुक्रे, अक्षय महाराज बालवडे, कृष्णा महाराज मांदळे, स्वराज्य महाराज खैरे, बाळासाहेब तांबे यांनी साथसंगत केली. सर्व संतजनांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक मोरे व प्रकाश चव्हाण यांनी केले, तर प्रा. अनिल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले
मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…
मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…
मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…
शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…
मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…