शिरूर तालुका

शिक्रापुरच्या ग्रंथालयात आता सापांबाबतची पुस्तके

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पुस्तके उपलब्ध

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या भैरवनाथ मोफत वाचनालय मध्ये 17 हजार हून अधिक वेगवेगळी पुस्तके उपलब्ध असताना आता निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाचनालयाला सापांबाबतची पुस्तके भेट देण्यात आल्याने ग्रंथालयात आता सापांबाबतची पुस्तके उपलब्ध झाली आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या भैरवनाथ मोफत वाचनालयमध्ये वेगवेगळी पुस्तके वाचनासाठी नागरिक येत असताना अनेकदा काही नागरिक सापांबाबतच्या पुस्तकांची मागणी करत असल्याने ग्रंथपाल संतोष काळे यांनी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेशी याबाबत चर्चा केली असता नुकतेच सदर संस्थेच्या वतीने ग्रंथालयाला सर्पतज्ञ निलीमकुमार काहीरे लिखित साप व ज्ञानेश्वर म्हात्रे लिखित सापांची अद्भुत दुनिया हि पुस्तके भेट देण्यात आली आहेत.

याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, ग्रंथपाल संतोष काळे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे, संचालक दत्ता कवाद, अलताभ सय्यद, सर्पमित्र अमोल कुसाळकर, विजय पडघन, राहुल शेजवळ, आदिनाथ चव्हाण हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सापांबाबतची माहिती नागरिकांना असणे गरजेची असून निसर्व वन्यजीव सामाजिक संस्थेच्या वतीने आता गावातील नागरिकांना सदर माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले. दरम्यान ग्रंथपाल संतोष काळे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

15 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

19 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

19 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

19 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

19 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

19 तास ago