शिरूर तालुका

केंदूर मधील पाचवड शाळेच्या मुलांनीच केली शाळेला मदत

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागामध्ये लोकसहभाग व शालेय मुलांच्या मदतीने शाळेचे विकास होऊन शाळा आदर्श होत असताना शिरूर तालुक्यातील 2 शालेय विद्यार्थ्यांनीच शाळेचे विकासासाठी पुढाकार घेत शाळेला काही रक्कम देणगी देऊ केली आहे.

केंदूर (ता. शिरूर) येथील शाळेतील मुलांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेलाच मदत करण्याचा निर्णय घेत युगांक शरद साकोरे व समृद्धी अमोल लिमगुडे या दोघा विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सुमारे प्रत्येकी २५०० देऊन शाळेसाठी मदत केली. तर विद्यार्थ्यांच्या मदतीनंतर बोलताना अशा लोक सहभागातुन शाळेसाठी संगणक खरेदी करण्याचा मानस असल्याचे मुख्याध्यापक कांता साकोरे यांनी सांगितले.

सध्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये ग्रामस्थ स्वखर्चातून शाळेला मदत करत असतात त्यातूनच शाळेच्या भौतिक विकासासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये पाचवड वस्तीवरील शाळा पहिली ते चौथी लहान गटात असून या शाळेसाठी तेथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग घेत असतात. या शाळेच्या माध्यमातून शाळेचा भौतिक विकास करण्यात आला आहे.

त्यामध्ये शाळेत कारपेट, विविध पुस्तके खरेदी करण्यात आलेले आहेत. शाळेचे रंगोटी व परिसर सजवण्यात आलेला आहे. या शाळेचा गुणात्मक दर्जाही उत्तम असून येथील मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले आहे. या शाळेच्या बदलासाठी येथील ग्रामस्थ व मुख्याध्यापिका कांता साकोरे व सहशिक्षिका रोहिणी नाईकरे काम करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यातील आहार कसा असावा

आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…

57 मिनिटे ago

किचनमध्ये काम करताना त्वचेला चटका लागल्यावर टूथपेस्ट लावता

अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…

1 तास ago

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

14 तास ago

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…

15 तास ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

15 तास ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

15 तास ago