शिरूर तालुका

केंदूर मधील पाचवड शाळेच्या मुलांनीच केली शाळेला मदत

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागामध्ये लोकसहभाग व शालेय मुलांच्या मदतीने शाळेचे विकास होऊन शाळा आदर्श होत असताना शिरूर तालुक्यातील 2 शालेय विद्यार्थ्यांनीच शाळेचे विकासासाठी पुढाकार घेत शाळेला काही रक्कम देणगी देऊ केली आहे.

केंदूर (ता. शिरूर) येथील शाळेतील मुलांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेलाच मदत करण्याचा निर्णय घेत युगांक शरद साकोरे व समृद्धी अमोल लिमगुडे या दोघा विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सुमारे प्रत्येकी २५०० देऊन शाळेसाठी मदत केली. तर विद्यार्थ्यांच्या मदतीनंतर बोलताना अशा लोक सहभागातुन शाळेसाठी संगणक खरेदी करण्याचा मानस असल्याचे मुख्याध्यापक कांता साकोरे यांनी सांगितले.

सध्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये ग्रामस्थ स्वखर्चातून शाळेला मदत करत असतात त्यातूनच शाळेच्या भौतिक विकासासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये पाचवड वस्तीवरील शाळा पहिली ते चौथी लहान गटात असून या शाळेसाठी तेथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग घेत असतात. या शाळेच्या माध्यमातून शाळेचा भौतिक विकास करण्यात आला आहे.

त्यामध्ये शाळेत कारपेट, विविध पुस्तके खरेदी करण्यात आलेले आहेत. शाळेचे रंगोटी व परिसर सजवण्यात आलेला आहे. या शाळेचा गुणात्मक दर्जाही उत्तम असून येथील मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले आहे. या शाळेच्या बदलासाठी येथील ग्रामस्थ व मुख्याध्यापिका कांता साकोरे व सहशिक्षिका रोहिणी नाईकरे काम करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

5 तास ago

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…

5 तास ago

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह…

5 तास ago

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…

5 तास ago

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…

6 तास ago

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…

6 तास ago