शिरूर तालुका

नागरिकांनी पावसाळ्यात सापांपासून सावध रहावे: शेरखान शेख

शिक्रापूर: पावसाळा सुरु झालेला असताना सापांच्या प्रजननाचा काळ सुरु झालेला असतो तसेच यावेळी सापांच्या बिळात पाणी गेल्याने अनेक साप निदर्शनास येत असल्याने सर्पदंशाचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सापांपासून सावध रहावे असे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.

पावसाळा सुरु होत असताना अनेक ठिकाणी सापांच्या बिळांमध्ये पाणी जाऊन साप निदर्शनास येतात तर या दरम्यान सापांच्या प्रजननाचा काळ असल्याने घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले मोठ्या प्रमाणात आढळून येतात. शक्यतो सदर पिल्ले कोठेतरी आडोसा घेऊन बसलेली असल्यामुळे शेतात सुद्धा निदर्शनास येतात व शेतात काम करताना सर्पदंश होत असतो.

unique international school

त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना पायात बुटाचा तसेच हातात ग्लोजचा वापर करावा तसेच सर्वत्र नागरिकांनी घराशेजारी असलेली जागा स्वच्छ ठेवावी, घराच्या आजूबाजूच्या परिसरात असलेले विटांचे, दगडांचे ढीग काढून टाकून, सापांपासून सावध राहून कोठेही साप निदर्शनास आल्यास वनविभाग अथवा जवळील सर्पमित्राला माहिती द्यावी, दुर्दैवाने कोणाला सर्पदंश झाल्यास त्यावर कोणताही उपाय ण करता तातडीने जवळील शासकीय रुग्णालयात सदर व्यक्तीला घेऊन जावे असे देखील आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

11 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

19 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago