शिरूर तालुका

विठ्ठलवाडीतील भीमा नदीवरील पूल अखेर पाण्याखाली

शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याचे शिरूर तालुका डॉट कॉमचे भाकीत अखेर खरे

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या पुलावरुन प्रत्येक वर्षी पाणी वाहत होत असल्याने शेजारील तालुक्यांचा संपर्क तुटत असतो. सध्या येथील भीमा नदीला पूर आल्याने भीमा नदी तुडुंब वाहत असताना असल्याने शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याची चिन्हे दिसू लागल्याबाबतची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केली होती अखेर सदर भाकीत खरे ठरले असून विठ्ठलवाडी येथील भीमा नदीला पूल पाण्याखाली जाऊन शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) हे शिरुर व दौड तालुक्याच्या सीमेवरील गाव असून येथील भीमा नदीच्या पुलावरुन दोन्ही तालुक्यांचा संपर्क होत असतो तर शेजारीच हवेली तालुक्याला सदर पुलावरुन वाहतूक होत असते. सध्या सुरु असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे येथील भीमा नदीला पूर आल्याने नदीचे पाणी विठ्ठलवाडीच्या पुलाला टेकत होते. पाण्याची पातळी वाढल्याने येथील शेतकऱ्यांनी सर्व विद्युत मोटार पाण्याच्या बाहेर काढून घेतल्या. सध्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाणी पुलाला टेकत आहे.

unique international school

परंतु पावसाचा जोर जास्त वाढल्यास तसेच पाणी पातळी वाढल्यास पाणी पुलावरून वाहत जाणार असल्याचे बोलले जात असताना याबाबत आम्ही बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केली अखेर आज पहाटेच्या सुमारास नदीचे पाणी वाढल्याने पाणी पुलावरून वाहू लागल्याने संपर्ण पूल पाण्याखाली गेला असून येथील शिरुर, हवेली व दौंड तालुक्यातील सर्व नागरिकांचा संपर्क तुटला असल्याने अनेक शेतकरी, कामगार, दुग्ध व्यावसायिक तसेच शालेय मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र दिवसभर येथील नागरिकांनी सदर पुलावरुन होणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

2 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

17 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

17 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

17 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

17 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

17 तास ago