शिरूर तालुका

सविंदणे व कान्हूर मेसाई येथील पिण्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटणार…

नळ पाणीपुरवठा योजनेस तब्बल २४ कोटी ६१ लक्ष ५ हजार रुपयांचा निधी मंजूर

सविंदने (अरुणकुमार मोटे): जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे कान्हूर मेसाई व सविंदणे या गावातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून तब्बल२४ कोटी ६१ लक्ष ५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

कान्हूर मेसाई व सविंदणे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहीत निकषापेक्षा जास्त होता. तसेच योजनेची किंमत रु. ५.०० कोटीपेक्षा जास्त असल्यामुळे सदर नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे यांनी संदर्भ क्रमांक ०९ अन्वये शासनाच्या मान्यतेकरीता सादर केला होता. प्रस्तुत नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे.

तसेच सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी समितीच्या दि. १० जून २०२२ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे मौजे कान्हूर मेसाई व सविंदणे येथील ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेच्या रु. २४६१.०५ ला (ढोबळ) इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून दुष्काळी असणाऱ्या कान्हूर मेसाई गावाला पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

कान्हूर मेसाई व सविंदणे येथील वाढती लोकसंख्या व गावठाणाच्या विस्तारामुळे पूर्वीच्या योजनांचे पाणी अपुरे पडत होते. त्यामुळे या दोन्ही गावांना कायमच पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पाण्या प्रश्न सुटण्यासाठी या गावांची स्वतंत्र योजना असावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. कान्हूरच्या सरपंच चंद्रभागा विठ्ठल खर्डे व सविंदण्याच्या सरपंच सोनाली अमोल खैरे यांनी याबाबत शासनाशी पत्रव्यवहार केला होता.

या प्रकल्पात पाणी साठवण, शुद्धीकरण प्रकल्प यांचा या योजनेत समावेश असून, योजनेच्या पूर्णत्वानंतर या दोन्ही गावांतील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. मुख्य गावठाणांबरोबरच भविष्यात या गावांच्या वाड्यावस्तांवरही शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून ही सुधारित महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना होत असल्याची माहिती आंबेगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष बाळासाहेब भोर व उपसरपंच भाऊसाहेब लंघे यांनी दिली.. ही योजना मंजूर होऊन कोटयावधी रुपयांचा निधी ऊपलब्ध करून दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व प्रशासकीय आधिकाऱ्यांचे दोनही गावच्या ग्रामस्थांनी आभार मानले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

1 तास ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

12 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

12 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

16 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

16 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

16 तास ago